शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

युती...अवघड जागेचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 01:07 IST

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

संदीप प्रधान / मुंबईप्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गेली काही दिवस या दोन पक्षांमधील वाटाघाटी ज्या पद्धतीने सुरू होत्या, ते पाहता, हे तर होणारच होते. राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडलेली नाही आणि निवडणुकीपूर्वी बाहेर पडण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे युती तोडण्याचा हा निर्णय तत्कालीक व सोईस्कर आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करताना एकमेकांची गरज लागली, तर लागलीच समविचारी पक्ष या नात्याने दोन्ही पक्ष एकत्र येतील. त्या वेळी महापौरपदापासून स्थायी समितीच्या पदापर्यंत वाटाघाटी, रुसवेफुगवे पाहायला मिळतील. मात्र, अखेर दोन्ही पक्ष गळ््यात गळे घालतील. निवडणुकीत अशी विखारी भाषणे करायचीच असतात व नंतर ती विसरायची असतात, अशी निलाजरी कबुलीही देतील. पुन्हा स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सिंडीकेट सक्रिय होईल आणि पारदर्शक कारभाराची पुढील पाच वर्षे कुणाला आठवण येणार नाही.यापूर्वी १९९२ मध्ये अशीच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तुटली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. मात्र, ते मतदारांना रुचले नाही. तेव्हा महापालिकेत काँग्रेस-रिपाइंची सत्ता आली होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या विभक्त होण्याला पार्श्वभूमी १९९०च्या विधानसभा निवडणुकीची होती. त्या वेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतामधील सरकार सत्तारूढ झाले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पवार यांचे संबंध बिघडल्यामुळे राज्यात अल्पमतामधील सरकार आणून पवार यांनी आपले महत्त्व वाढवल्याची चर्चा त्या वेळी होती. शिवसेनेचे मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते झाले, ते याच वर्षी आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज होऊन शिवसेनेत फुटीची बिजे रोवली गेली, तीही त्याच वर्षी. देशातील हिंदुत्वाचा झंझावात त्या वेळी उन्मादक अवस्थेत होता आणि सत्ता शिवसेना-भाजपाला दिसू लागली होती. त्यामुळे आपापल्या ताकदीचा अंदाज १९९२ च्या महापालिका निवडणुकीत घेतला गेला. हा इतिहास नमूद करण्यामागील हेतू हाच आहे की, मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण आहे. ही सत्ता नसेल, तर शिवसेना गलितगात्र होते. या वेळी पुन्हा शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला केला जात असून, हा हल्लेखोर शिवसेनेचा २५ वर्षांचा मित्रपक्ष भाजपा आहे.बाबरी मशिदीच्या पतनानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारच्या काळात युतीमधील संघर्ष अनेकदा उफाळून आला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी असतानाही युतीच्या जागा १३ ने कमी झाल्या होत्या. त्यात भाजपाच्या जागा गतवेळीपेक्षा ९ने तर शिवसेनेच्या जागा गतवेळीपेक्षा ४ने घटल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी सत्ता स्थापनेसाठी तीनदा संधी दिली. मात्र, नारायण राणे व गोपीनाथ मुंडे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षात पुन्हा युतीचे सरकार आले नाही. एकाच विचारधारेच्या दोन पक्षांत सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती असावी, यावरून सुरू असलेला संघर्ष जुना आहे. त्यामुळे २५ वर्षे युती करून सडलो, हे उद्धव ठाकरे यांचे विधान अर्धसत्य आहे. युती नसती, तर सत्ता दिसली नसती आणि सत्ता दिसली नसती, तर युतीमध्ये सडल्याची भावना प्रबळ झाली नसती.