शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

युती...अवघड जागेचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 01:07 IST

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

संदीप प्रधान / मुंबईप्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गेली काही दिवस या दोन पक्षांमधील वाटाघाटी ज्या पद्धतीने सुरू होत्या, ते पाहता, हे तर होणारच होते. राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडलेली नाही आणि निवडणुकीपूर्वी बाहेर पडण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे युती तोडण्याचा हा निर्णय तत्कालीक व सोईस्कर आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करताना एकमेकांची गरज लागली, तर लागलीच समविचारी पक्ष या नात्याने दोन्ही पक्ष एकत्र येतील. त्या वेळी महापौरपदापासून स्थायी समितीच्या पदापर्यंत वाटाघाटी, रुसवेफुगवे पाहायला मिळतील. मात्र, अखेर दोन्ही पक्ष गळ््यात गळे घालतील. निवडणुकीत अशी विखारी भाषणे करायचीच असतात व नंतर ती विसरायची असतात, अशी निलाजरी कबुलीही देतील. पुन्हा स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सिंडीकेट सक्रिय होईल आणि पारदर्शक कारभाराची पुढील पाच वर्षे कुणाला आठवण येणार नाही.यापूर्वी १९९२ मध्ये अशीच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तुटली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. मात्र, ते मतदारांना रुचले नाही. तेव्हा महापालिकेत काँग्रेस-रिपाइंची सत्ता आली होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या विभक्त होण्याला पार्श्वभूमी १९९०च्या विधानसभा निवडणुकीची होती. त्या वेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतामधील सरकार सत्तारूढ झाले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पवार यांचे संबंध बिघडल्यामुळे राज्यात अल्पमतामधील सरकार आणून पवार यांनी आपले महत्त्व वाढवल्याची चर्चा त्या वेळी होती. शिवसेनेचे मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते झाले, ते याच वर्षी आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज होऊन शिवसेनेत फुटीची बिजे रोवली गेली, तीही त्याच वर्षी. देशातील हिंदुत्वाचा झंझावात त्या वेळी उन्मादक अवस्थेत होता आणि सत्ता शिवसेना-भाजपाला दिसू लागली होती. त्यामुळे आपापल्या ताकदीचा अंदाज १९९२ च्या महापालिका निवडणुकीत घेतला गेला. हा इतिहास नमूद करण्यामागील हेतू हाच आहे की, मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण आहे. ही सत्ता नसेल, तर शिवसेना गलितगात्र होते. या वेळी पुन्हा शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला केला जात असून, हा हल्लेखोर शिवसेनेचा २५ वर्षांचा मित्रपक्ष भाजपा आहे.बाबरी मशिदीच्या पतनानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारच्या काळात युतीमधील संघर्ष अनेकदा उफाळून आला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी असतानाही युतीच्या जागा १३ ने कमी झाल्या होत्या. त्यात भाजपाच्या जागा गतवेळीपेक्षा ९ने तर शिवसेनेच्या जागा गतवेळीपेक्षा ४ने घटल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी सत्ता स्थापनेसाठी तीनदा संधी दिली. मात्र, नारायण राणे व गोपीनाथ मुंडे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षात पुन्हा युतीचे सरकार आले नाही. एकाच विचारधारेच्या दोन पक्षांत सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती असावी, यावरून सुरू असलेला संघर्ष जुना आहे. त्यामुळे २५ वर्षे युती करून सडलो, हे उद्धव ठाकरे यांचे विधान अर्धसत्य आहे. युती नसती, तर सत्ता दिसली नसती आणि सत्ता दिसली नसती, तर युतीमध्ये सडल्याची भावना प्रबळ झाली नसती.