शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

युती...अवघड जागेचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 01:07 IST

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

संदीप प्रधान / मुंबईप्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गेली काही दिवस या दोन पक्षांमधील वाटाघाटी ज्या पद्धतीने सुरू होत्या, ते पाहता, हे तर होणारच होते. राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडलेली नाही आणि निवडणुकीपूर्वी बाहेर पडण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे युती तोडण्याचा हा निर्णय तत्कालीक व सोईस्कर आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करताना एकमेकांची गरज लागली, तर लागलीच समविचारी पक्ष या नात्याने दोन्ही पक्ष एकत्र येतील. त्या वेळी महापौरपदापासून स्थायी समितीच्या पदापर्यंत वाटाघाटी, रुसवेफुगवे पाहायला मिळतील. मात्र, अखेर दोन्ही पक्ष गळ््यात गळे घालतील. निवडणुकीत अशी विखारी भाषणे करायचीच असतात व नंतर ती विसरायची असतात, अशी निलाजरी कबुलीही देतील. पुन्हा स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सिंडीकेट सक्रिय होईल आणि पारदर्शक कारभाराची पुढील पाच वर्षे कुणाला आठवण येणार नाही.यापूर्वी १९९२ मध्ये अशीच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तुटली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. मात्र, ते मतदारांना रुचले नाही. तेव्हा महापालिकेत काँग्रेस-रिपाइंची सत्ता आली होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या विभक्त होण्याला पार्श्वभूमी १९९०च्या विधानसभा निवडणुकीची होती. त्या वेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतामधील सरकार सत्तारूढ झाले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पवार यांचे संबंध बिघडल्यामुळे राज्यात अल्पमतामधील सरकार आणून पवार यांनी आपले महत्त्व वाढवल्याची चर्चा त्या वेळी होती. शिवसेनेचे मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते झाले, ते याच वर्षी आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज होऊन शिवसेनेत फुटीची बिजे रोवली गेली, तीही त्याच वर्षी. देशातील हिंदुत्वाचा झंझावात त्या वेळी उन्मादक अवस्थेत होता आणि सत्ता शिवसेना-भाजपाला दिसू लागली होती. त्यामुळे आपापल्या ताकदीचा अंदाज १९९२ च्या महापालिका निवडणुकीत घेतला गेला. हा इतिहास नमूद करण्यामागील हेतू हाच आहे की, मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण आहे. ही सत्ता नसेल, तर शिवसेना गलितगात्र होते. या वेळी पुन्हा शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला केला जात असून, हा हल्लेखोर शिवसेनेचा २५ वर्षांचा मित्रपक्ष भाजपा आहे.बाबरी मशिदीच्या पतनानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारच्या काळात युतीमधील संघर्ष अनेकदा उफाळून आला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी असतानाही युतीच्या जागा १३ ने कमी झाल्या होत्या. त्यात भाजपाच्या जागा गतवेळीपेक्षा ९ने तर शिवसेनेच्या जागा गतवेळीपेक्षा ४ने घटल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी सत्ता स्थापनेसाठी तीनदा संधी दिली. मात्र, नारायण राणे व गोपीनाथ मुंडे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षात पुन्हा युतीचे सरकार आले नाही. एकाच विचारधारेच्या दोन पक्षांत सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती असावी, यावरून सुरू असलेला संघर्ष जुना आहे. त्यामुळे २५ वर्षे युती करून सडलो, हे उद्धव ठाकरे यांचे विधान अर्धसत्य आहे. युती नसती, तर सत्ता दिसली नसती आणि सत्ता दिसली नसती, तर युतीमध्ये सडल्याची भावना प्रबळ झाली नसती.