शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी युतीची समन्वय समिती

By admin | Updated: August 9, 2016 07:20 IST

पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुंबईतील नागरी प्रश्न, विशेषत: गृहनिर्माण प्रकल्प (एसआरए, बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास आदी) तसेच मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात (डीपी) भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षांचे मुंबईतील काही मंत्रीदेखील या समितीमध्ये असतील. या समितीच्या नियमित बैठका होतील. भाजपाचे मंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामे करीत नाहीत, शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये पुरेसा निधी वा योजना दिल्या जात नाहीत, अशी तक्रार अलीकडे पक्षाच्या प्रतोदांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एका बैठकीत केली होती. या तक्रारीची दखल घेत याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर प्रतोदांची बैठक घेण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार आज उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे, शंभूराजे देसाई, संजय शिरसाठ, सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक हे पक्षाचे प्रतोद आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दीड तास बैठक झाली. सर्व प्रतोदांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना भाजपाकडील कोणत्या खात्यांमधून पुरेसा निधी मिळत नाही, याची माहिती प्रतोदांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर आपण त्या मंत्र्यांशी व्यक्तिश: बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आम्हाला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना प्रतोदांनी सोमवारच्या बैठकीत मांडली. याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा व स्वच्छता ही दोन्ही खाती भाजपाकडे आहेत. आमदारांच्या अडकलेल्या कामांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली. शिवसेनेच्या आमदारांच्या विभागवार बैठका घेऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्री सोडविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)