शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

आघाडीचा तिढा कायम

By admin | Updated: September 24, 2014 05:11 IST

एकीकडे महायुतीचे एकदाचे जमले असे चित्र असताना आघाडीतील बिघाडी मात्र मंगळवारीही कायम राहिली. आघाडीची पुन्हा सत्ता आल्यास अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि १४४ जागांची मागणी राष्ट्रवादीने केली

मुंबई : एकीकडे महायुतीचे एकदाचे जमले असे चित्र असताना आघाडीतील बिघाडी मात्र मंगळवारीही कायम राहिली. आघाडीची पुन्हा सत्ता आल्यास अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि १४४ जागांची मागणी राष्ट्रवादीने केली असून, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव फेटाळत १२४ जागा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. त्यामुळे सकाळी झालेली जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली असून, यावर आता बुधवारपर्यंत अंतिम तोडगा काढला जाईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, बांधकाम मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. आघाडीमध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे सूत्र ठरले असताना राष्ट्रवादीने मंगळवारी अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला. आपण अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागत आहात म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत, अशी आपल्याला शंका वाटते का, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत केल्यानंतर राष्ट्रवादीने हा मुद्दा लावून धरला नाही, असे समजते. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून तिढा सुटणार नसेल तर दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी याबाबत चर्चा करावी, असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत लावला पण जागावाटपाची कोणतीही चर्चा आता दिल्लीत होणार नाही. श्रेष्ठींनी आम्हाला त्याबाबतचे सर्वाधिकार दिलेले आहेत, असे मुख्यमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मंगळवारच्या बैठकीत स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस १४४ जागांवर ठाम असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितले असल्याची माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांना दिली. (विशेष प्रतिनिधी)