शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

युती आघाडीतील उमेदवार आमने-सामने

By admin | Updated: February 7, 2017 04:20 IST

इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा करावी लागली

आविष्कार देसाई , अलिबागइच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा करावी लागली. उमेदवारी मिळाल्याने युती आघाडीतील उमेदवार निवडणुकीसाठी आमने-सामने आहेत. यातून एकाला माघार घ्यावी लागणार आहे मात्र माघार घेतली नाही, तर युती आघाडीचा धर्म या निवडणुकीत न पाळल्याचे उघड होऊन त्याचा फायदा विरोधी उमेदवारांना होणार असल्याचे दिसून येते.अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ३९ तर, पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६६ असे एकूण १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने चेंढरे पंचायत समिती गणासाठी अ‍ॅड.जनार्दन पाटील यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली, परंतु आघाडातील घटक पक्ष असणाऱ्या शेकापनेही तेथे अधिकृत उमेदवार उभा करुन आव्हान उभे केले आहे. तीच परिस्थिती कुडूर्स पंचायत समिती गणात राष्ट्रवादीला अलविदा करुन शिवसेनेत गेलेले राजा केणी यांची झाली आहे. तेथेही त्यांच्या आघाडीतील काँग्रेसने आधीच उमेदवार उभा केला आहे. राजा केणी उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी शिवसेनेत दाखल झाले.अलिबाग तालुक्यातून प्रामुख्याने थळ जिल्हा परिषद मतदार संघात शेकापच्या चित्रा पाटील यांनी, तर शिवसेनेच्या मानसी दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चित्रा पाटील यांनी याआधीही कुडूर्स जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या मानसी दळवी यांना टक्कर देण्यासाठी त्यांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.जिल्ह्यामध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाली आहे. अलिबागमध्ये शेकापने राष्ट्रवादीला एकही जागा सोडलेली नाही. थळ मतदार संघ हा राष्ट्रवादीचा आहे, परंतु त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीने तेथे काही रस दाखविला नाही. युती असल्याने किमान पंचायत समितीच्या दोन जागा मिळाव्यात अशी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची इच्छा होती. चेंढरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे जनार्दन पाटील हे पत्नीसाठी, तर कुडूर्स पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा केणी इच्छुक होते. मात्र सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट संकेत त्यांना मिळत नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत होती, तशी त्यांची धाकधूक वाढत होती. उमेदवारी न मिळाल्याने अखेर राजा केणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत दाखल होण्याचे जाहीर केले. जनार्दन पाटील हे पक्ष सोडून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास तयार झाले होते. मात्र शेवटचा उपाय म्हणून त्यांनी पुन्हा सुनील तटकरे यांना साकडे घातले. राष्ट्रवादी अलिबाग तालुक्यात शाबूत ठेवायची असेल, तर कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार केलाच पाहिजे म्हणून तटकरे यांनी पाटील यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे बोलले जाते.सोमवारी पाटील यांनी पत्नी सुलभा पाटील यांचा अर्ज दाखल केला. त्याचबरोबर शेकापनेही स्वाती पाटील यांना अधिकृत उमेदवारी देत अर्ज दाखल केला. महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनीही चेंढरेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे युती आघाडीतील उमेदवार आमने-सामने आहेत. दुसरीकडे राजा केणी यांनाही शिवसेनेने कुडूर्स पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी देत त्यांचाही अर्ज दाखल केला. काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आघाडी आहे. विशेष म्हणजे याच कुडूर्स पंचायत समिती मतदार संघातून काँग्रेसने अनंत पाटील यांना अधिकृत उमेदवारी आधीच दिली आहे. त्यामुळे चेंढरे, कुडूर्स पंचायत समिती गणातून प्रत्येकी एका उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे. तसे न झाल्यास विरोधी उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.