शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची पदवी बोगस असल्याचा आरोप

By admin | Updated: June 22, 2015 16:55 IST

विनोद तावडे यांची इंजिनीअरिंगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून घेतलेली असून या विद्यापीठाला शासनमान्यता नव्हती त्यामुळे तावडे यांची डिग्रीच बोगस होती असा आरोप होत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २२ - सध्या राजकीय नेत्यांच्या पदवीवरून रणधुमाळी माजलेली असताना, आता खुद्द महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्रीच वादाच्या भोव-यात सापडले आहेत. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची इंजिनीअरिंगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून घेतलेली असून या विद्यापीठाला शासनमान्यता नव्हती त्यामुळे तावडे यांची डिग्रीच बोगस होती असा आरोप होत आहे.
खुद्द तावडे यांनीही आपली डिग्री शासनमान्य नसल्याचे सांगताना, प्रतिज्ञापत्रात ही पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठाची असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, त्यामुळे यात कुठलीही फसवणूक केलेली नाही असा दावा केला आहे. मात्र, ज्या विद्यापीठाला शासनमान्यता नाही, अथवा ज्या पदवीला मुंबई वा पुणे अथवा तत्सम अधिकृत विद्यापीठाचीच मान्यता नाही ते शिक्षण मूळातच पदवी म्हणवून घेऊ शकते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आत्तापर्यंत स्मृती इराणी, जितेंद्र तोमर, छगन भुजबळ, बबन लोणीकर अशा अनेक नेत्यांच्या पदवीवरून आणि त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावरून बराच गदारोळ माजला आहे. आता खुद्द महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्रीच पदवीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत.
 
दरम्यान, विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. मला त्याचा गर्व आहे. त्या विद्यापीठात मी घेतलेली पदवी कधीही लपवलेली नाही. माझ्या प्रतिज्ञापत्रात ही पदवी मी स्पष्टपणे लिहिलेली आहे.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळावा म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे यांच्या सप्रे व इतर सरांनी एक ब्रिज कोर्स सुरु केला होता. या कोर्सला मी १९८० मध्ये प्रवेश घेतला. हा कोर्स अर्धवेळ शिक्षण व अर्धवेळ इंटर्नशिप ऐसा होता. मी १९८४ ला हा कोर्स करून पास झालो. 
सदर कोर्सला शासन मान्यता नाही हे मला प्रवेश घेताना सांगण्यात आले होते. त्याच्या जोडीला अशी मान्यता आम्ही घेणार नाही ही सप्रे सर व इतरांची भूमिका होती. जी मला माहिती होती व मान्यही होती.
पुढे कालांतराने मनोहर जोशी ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यानंतर जोशी यांचे कुणी विरोधक कोर्टात गेल्याने सदर कोर्सवर कोर्टाकडून बंदी आली व विद्यापीठाने तो कोर्स तात्काळ बंद केला.
या कोर्सला शासन मान्यता नसल्याने मी कधीही पासपोर्टसाठी पदवीधारकांना असणारे लाभ घेतलेले नाहीत. ना मी कधी स्वतःची पदवीधारक मतदार म्हणून  नोंदणी केली आहे. या कोर्स शिवायचे माझे शिक्षण १२वी पास इतके आहे व ते मी लपवलेले नाही असेही तावडे यांनी सांगितले आहे.