शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

स्वबळावर सत्तेचे सर्वांचेच नारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 05:28 IST

प्रचार सभांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुवाधार फैरी शनिवारी झडल्या. मुंबईतील सभांमधून दिग्गज नेत्यांचे आवाज राज्यभर पोहोचले. तर पिंपरी चिंचवडमधून शरद पवार

मुंबई : प्रचार सभांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुवाधार फैरी शनिवारी झडल्या. मुंबईतील सभांमधून दिग्गज नेत्यांचे आवाज राज्यभर पोहोचले. तर पिंपरी चिंचवडमधून शरद पवार यांनीही विरोधकांवर शरसंधान केले. मुंबईत तर पालिकेचा रणसंग्रामाचा शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. खालच्या पातळीवरील बोचरी टीका, स्वबळाचे दावे-प्रतिदावे मतदार राजाने अनुभवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रचाराची राळ उडवली. उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याच्या घोषणेनंतर ओढलेले टीकेचे आसूड अखेरच्या प्रचार सभेत अधिक तीव्र केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा कायम ठेवली. राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाजपा-सेनेवर घणाघाती प्रहार केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचार सभांचा आवाज मात्र हवा तसा घुमला नाही. भायखळ्यात अकबरुद्दिन ओवैसींनी यंदा पालिकेत ‘एमआयएम’चा पतंग उडणार असल्याचा दावा केला. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली मुंबई महापालिकेची निवडणूक मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर २३ तारखेला निकाल जाहीर होतील. २२७ प्रभागांमधून २,२७५ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. युती तुटल्यानंतर जवळपास सर्वच प्रभागांमध्ये पंचरंगी लढती रंगत आहेत. सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याने कुरघोडीचे राजकारण मुंबईकरांनी गेल्या २० दिवसांत अनुभवले. आता २३ फेब्रुवारीचे वेध तमाम मुंबईकरांना लागले आहेत. (प्रतिनिधी)२३ तारखेला औकात दाखवूशिवसेनेने गेली ५० वर्षे अहोरात्र सेवा करूनच मुंबई जिंकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले आहेत. तरीही ते अजून थापाच मारत आहेत. आमची औकात काढली, कपडे उतरविण्याची भाषा केलीत, मुंबईकर जनता २३ तारखेला तुम्हाला औकात दाखवेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. निवडणुकीत कोट्यवधी...आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे. मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले? याबाबत कोणीच काहीच बोलत नाही. आम्ही नाशिकचा विकास केला. मात्र हे लोक विकासावर बोलत नाहीत, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपासह शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. २२ वर्षे पारदर्शकता कुठे होती? - चव्हाणखेड्यापाड्यातही मुंबईइतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्षे शिवसेना-भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ, मिळून सगळं खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षांत कुठे गेली होती तुमची पारदर्शकता? मुख्यमंत्री म्हणतात, परिवर्तन तर होणारच! ते होईल, पण भाजपाच्या बाजूने नाही, तर काँग्रेसच्या बाजूने, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सेना, भाजपावर हल्लाबोल केला.