शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 18:44 IST

देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे

ऑनलाइन लोकमतधुळे, दि.19 - देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे, अशी स्पष्ट भुमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आझमी यांनी धुळयात मांडली़समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आझमी धुळयात आले होते़ या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, भाजप सरकार केवळ धार्मिक तेढ निर्माण करीत असून सर्वसामान्यांचे प्रश्न राज्यात कायम आहेत़ शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे, सुर्यनमस्काराची सक्ती केली जात आहे, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप केला जात आहे, मुंबईत ५१ हजार अनधिकृत इमारती असतांना गोरगरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत, सर्वत्र भ्रष्टाचार वाढला असल्याचे सांगत त्यांनी विविध विषयांवर भुमिका मांडली़ ए दिल मुश्कील चित्रपटाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवरही आझमी यांनी टिका केली़ एकिकडे राज ठाकरे चित्रपट प्रदर्शनास विरोध करीत असून भाजप सरकार चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आग्रही आहे़ त्यामुळे खरे देशद्रोही कोण? असा प्रश्न अबु आझमी यांनी उपस्थित केला़ तसेच जो न्याय सर्वसामान्यांना दिला जातो तोच राज ठाकरेंना देऊन त्यांची दादागिरी थांबवायला हवी असेही आझमी म्हणाले़ तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी अत्यंत दुबळे झाले असून बाळासाहेब ठाकरेंसारखी खंबीर भुमिका उरली नसल्याची टिका आझमी यांनी केली़ समान नागरिक कायद्याला विरोध करणार असल्याचे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले़ यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते़मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत अबु आझमी यांनी पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली़ शिवाय सेना-भाजपसह त्यांनी काँग्रेसवरही टिका केली़