शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 18:44 IST

देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे

ऑनलाइन लोकमतधुळे, दि.19 - देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे, अशी स्पष्ट भुमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आझमी यांनी धुळयात मांडली़समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आझमी धुळयात आले होते़ या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, भाजप सरकार केवळ धार्मिक तेढ निर्माण करीत असून सर्वसामान्यांचे प्रश्न राज्यात कायम आहेत़ शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे, सुर्यनमस्काराची सक्ती केली जात आहे, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप केला जात आहे, मुंबईत ५१ हजार अनधिकृत इमारती असतांना गोरगरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत, सर्वत्र भ्रष्टाचार वाढला असल्याचे सांगत त्यांनी विविध विषयांवर भुमिका मांडली़ ए दिल मुश्कील चित्रपटाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवरही आझमी यांनी टिका केली़ एकिकडे राज ठाकरे चित्रपट प्रदर्शनास विरोध करीत असून भाजप सरकार चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आग्रही आहे़ त्यामुळे खरे देशद्रोही कोण? असा प्रश्न अबु आझमी यांनी उपस्थित केला़ तसेच जो न्याय सर्वसामान्यांना दिला जातो तोच राज ठाकरेंना देऊन त्यांची दादागिरी थांबवायला हवी असेही आझमी म्हणाले़ तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी अत्यंत दुबळे झाले असून बाळासाहेब ठाकरेंसारखी खंबीर भुमिका उरली नसल्याची टिका आझमी यांनी केली़ समान नागरिक कायद्याला विरोध करणार असल्याचे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले़ यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते़मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत अबु आझमी यांनी पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली़ शिवाय सेना-भाजपसह त्यांनी काँग्रेसवरही टिका केली़