शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 18:44 IST

देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे

ऑनलाइन लोकमतधुळे, दि.19 - देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे, अशी स्पष्ट भुमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आझमी यांनी धुळयात मांडली़समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आझमी धुळयात आले होते़ या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, भाजप सरकार केवळ धार्मिक तेढ निर्माण करीत असून सर्वसामान्यांचे प्रश्न राज्यात कायम आहेत़ शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे, सुर्यनमस्काराची सक्ती केली जात आहे, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप केला जात आहे, मुंबईत ५१ हजार अनधिकृत इमारती असतांना गोरगरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत, सर्वत्र भ्रष्टाचार वाढला असल्याचे सांगत त्यांनी विविध विषयांवर भुमिका मांडली़ ए दिल मुश्कील चित्रपटाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवरही आझमी यांनी टिका केली़ एकिकडे राज ठाकरे चित्रपट प्रदर्शनास विरोध करीत असून भाजप सरकार चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आग्रही आहे़ त्यामुळे खरे देशद्रोही कोण? असा प्रश्न अबु आझमी यांनी उपस्थित केला़ तसेच जो न्याय सर्वसामान्यांना दिला जातो तोच राज ठाकरेंना देऊन त्यांची दादागिरी थांबवायला हवी असेही आझमी म्हणाले़ तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी अत्यंत दुबळे झाले असून बाळासाहेब ठाकरेंसारखी खंबीर भुमिका उरली नसल्याची टिका आझमी यांनी केली़ समान नागरिक कायद्याला विरोध करणार असल्याचे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले़ यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते़मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत अबु आझमी यांनी पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली़ शिवाय सेना-भाजपसह त्यांनी काँग्रेसवरही टिका केली़