शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शांतता समित्या बरखास्त होणार

By admin | Updated: July 17, 2015 23:05 IST

शासनाचा निर्णय : राज्यातील शांतता व पोलीस मित्र समित्यांची पुनर्स्थापना

भरत शास्त्री - बाहुबली -राज्यातील जातीय तणावाच्या परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या विविध शांतता व पोलीस मित्र समित्या बरखास्त करून नवीन समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.सध्या राज्यामध्ये विविध शांतता समित्या, मोहल्ला समित्या आहेत. या समित्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्वच शांतता समित्या बरखास्त करण्यात येणार आहेत. नवीन शांतता समिती स्थापन करताना पोलीस पडताळणी करूनच सदस्यांची निवड केली जाणार आहे. नवीन आदेशानुसार जिल्हा स्तरावरील शांतता समिती, आयुक्तालय स्तरावरील शांतता समिती, तालुका स्तरावरील शांतता समिती, परिमंडल स्तरावरील शांतता समिती, पोलीस ठाणे स्तरावरील शांतता समिती व पोलीस मित्र अशा सहा समित्यांची स्थापना केली जाणार आहे.वरील समित्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, शिक्षक, वकील, पत्रकार, विविध धर्मांचे प्रतिनिधी, व्यापारी, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पुरोगामी विचारसरणीच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शासकीय नियंत्रणेसह सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांतून निवडलेल्या सर्व समित्यांच्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थाविषयक समस्या, सुरक्षिततेचे उपाय, जातीय सलोख्यासाठी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. विविध धार्मिक समारंभापूर्वी त्या-त्या समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन बैठका करणे, जातीय तणाव किंवा दंगल होऊ नये याबाबत देखील शांतता समितीवर जबाबदारी देण्यात आली आहे.शांतता समितीप्रमाणेच पोलीस मित्रदेखील स्थानिक पातळीवरील समस्या किंवा गुन्ह्यांबाबत माहिती देणे, समाजातील विकृत घटकांवर नियंत्रण ठेवण्यासह सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणार आहेत. एकंदरीतच या नव्या समितीचा शांतता प्रस्थापित होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा आहे.नवीन शांतता समितीजिल्हास्तरआयुक्तालय स्तरतालुकास्तरपरिमंडळ स्तरपोलीस ठाणे स्तरपोलीस मित्रशांतता समितीची मुख्य कर्तव्येकायदा-सुव्यवस्था कायम राखणेअफवा पसरविणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखणेधार्मिक कार्यक्रमांमध्ये मिरवणुकीवेळी जातीय सलोखा राखणेआपत्कालीन स्थितीत शासकीय यंत्रणेसोबत सहकार्य करणेतंटे-वाद-विवाद यांना स्थानिक पातळीवर संपविणे