शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

सर्व शांतता समित्या बरखास्त होणार

By admin | Updated: July 17, 2015 23:05 IST

शासनाचा निर्णय : राज्यातील शांतता व पोलीस मित्र समित्यांची पुनर्स्थापना

भरत शास्त्री - बाहुबली -राज्यातील जातीय तणावाच्या परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या विविध शांतता व पोलीस मित्र समित्या बरखास्त करून नवीन समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.सध्या राज्यामध्ये विविध शांतता समित्या, मोहल्ला समित्या आहेत. या समित्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्वच शांतता समित्या बरखास्त करण्यात येणार आहेत. नवीन शांतता समिती स्थापन करताना पोलीस पडताळणी करूनच सदस्यांची निवड केली जाणार आहे. नवीन आदेशानुसार जिल्हा स्तरावरील शांतता समिती, आयुक्तालय स्तरावरील शांतता समिती, तालुका स्तरावरील शांतता समिती, परिमंडल स्तरावरील शांतता समिती, पोलीस ठाणे स्तरावरील शांतता समिती व पोलीस मित्र अशा सहा समित्यांची स्थापना केली जाणार आहे.वरील समित्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, शिक्षक, वकील, पत्रकार, विविध धर्मांचे प्रतिनिधी, व्यापारी, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पुरोगामी विचारसरणीच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शासकीय नियंत्रणेसह सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांतून निवडलेल्या सर्व समित्यांच्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थाविषयक समस्या, सुरक्षिततेचे उपाय, जातीय सलोख्यासाठी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे. विविध धार्मिक समारंभापूर्वी त्या-त्या समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन बैठका करणे, जातीय तणाव किंवा दंगल होऊ नये याबाबत देखील शांतता समितीवर जबाबदारी देण्यात आली आहे.शांतता समितीप्रमाणेच पोलीस मित्रदेखील स्थानिक पातळीवरील समस्या किंवा गुन्ह्यांबाबत माहिती देणे, समाजातील विकृत घटकांवर नियंत्रण ठेवण्यासह सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणार आहेत. एकंदरीतच या नव्या समितीचा शांतता प्रस्थापित होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा आहे.नवीन शांतता समितीजिल्हास्तरआयुक्तालय स्तरतालुकास्तरपरिमंडळ स्तरपोलीस ठाणे स्तरपोलीस मित्रशांतता समितीची मुख्य कर्तव्येकायदा-सुव्यवस्था कायम राखणेअफवा पसरविणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखणेधार्मिक कार्यक्रमांमध्ये मिरवणुकीवेळी जातीय सलोखा राखणेआपत्कालीन स्थितीत शासकीय यंत्रणेसोबत सहकार्य करणेतंटे-वाद-विवाद यांना स्थानिक पातळीवर संपविणे