शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

सर्व महापालिकांत क्लस्टर हवे

By admin | Updated: July 15, 2017 03:25 IST

ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, नवी मुंबई अशा महापालिका क्षेत्रांतही पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरित मंत्रालयात पाठवावेत, जेणेकरून ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आणि जुना आहे, असा मुद्दा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी या बैठकीत उपस्थित केला. तेव्हा कल्याण आणि मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महापालिकांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले. पण, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. याचदरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेची इमारतही महापालिकेने धोकादायक जाहीर केली असल्याचे सांगताना, क्लस्टरमध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत सूचना त्यांनी केली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी तीच इमारत नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या इतर शासकीय इमारती मिळून क्लस्टर योजनेंतर्गत बांधकाम करता येईल, हे पाहावे लागेल. जर तसेच झाल्यास ते सर्व एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. तर, जिल्ह्यातील पालिकांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून त्याचा प्रस्ताव पाठवण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले. >ओसी नाही म्हणून डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया न थांबवण्याचा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवणारकेवळ भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही, म्हणून मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रि या थांबवू नये, त्यासाठी मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थानादेखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करून तसा ठराव मांडला. त्या वेळी पालकमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवून ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले.या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘परिवर्तन’ त्रैमासिकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. याप्रसंगी खासदार आणि आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.