शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
2
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
3
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
4
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
5
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
6
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
7
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
8
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
9
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
10
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
11
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
12
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
13
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
14
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
15
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
16
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
17
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
18
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
19
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
20
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व महापालिकांत क्लस्टर हवे

By admin | Updated: July 15, 2017 03:25 IST

ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, नवी मुंबई अशा महापालिका क्षेत्रांतही पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरित मंत्रालयात पाठवावेत, जेणेकरून ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आणि जुना आहे, असा मुद्दा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी या बैठकीत उपस्थित केला. तेव्हा कल्याण आणि मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महापालिकांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले. पण, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. याचदरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेची इमारतही महापालिकेने धोकादायक जाहीर केली असल्याचे सांगताना, क्लस्टरमध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत सूचना त्यांनी केली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी तीच इमारत नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या इतर शासकीय इमारती मिळून क्लस्टर योजनेंतर्गत बांधकाम करता येईल, हे पाहावे लागेल. जर तसेच झाल्यास ते सर्व एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. तर, जिल्ह्यातील पालिकांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून त्याचा प्रस्ताव पाठवण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले. >ओसी नाही म्हणून डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया न थांबवण्याचा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवणारकेवळ भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही, म्हणून मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रि या थांबवू नये, त्यासाठी मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थानादेखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करून तसा ठराव मांडला. त्या वेळी पालकमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवून ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले.या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘परिवर्तन’ त्रैमासिकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. याप्रसंगी खासदार आणि आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.