शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

देशात डाळ सोडून सर्व स्वस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 05:19 IST

देशात कोणतीही महागाई नसून डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी येथे केले.

नागपूर : देशात कोणतीही महागाई नसून डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी येथे केले. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना गंगवार यांनी केलेल्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भूमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या समर्थनार्थ नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशात डाळ सोडली तर गहू, तांदूळ, तेल इत्यादी गोष्टी स्वस्त आहेत. डाळीचे उत्पादनच कमी झाले आहे. डाळीच्या पिकाचे नीलगाय तसेच इतर जनावरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे किमती वाढलेल्या आहेत. परंतु उत्पादन वाढवून आणि आयात केल्याने डाळीच्या किमती नियंत्रित होऊ शकतात. डाळीच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी ऊर्जित पटेल यांची झालेली निवड योग्यच आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. रघुराम राजन यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना हटविण्यात आलेले नाही. ऊर्जित पटेल देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतील, असा विश्वासही गंगवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>जावडेकरांच्या वक्तव्यावर मौनकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यलढ्यात फासावर गेले होते, असे वादग्रस्त वक्तव्य दिले होते. यावर गंगवार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. >‘जीएसटी’ विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाले आहे. आसाम व बिहार या दोन राज्यांच्या विधानसभेतदेखील याला मंजुरी मिळाली आहे. इतर राज्यदेखील याबाबतीत सकारात्मक असून, दोन महिन्यांत सर्व राज्यांतून मंजुरी मिळेल. - संतोष गंगवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री