शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय साहित्य संमेलनच हवे

By admin | Updated: April 27, 2016 03:42 IST

कल्याण-डोंबिवलीमध्ये आम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच हवे आहे.

मुरलीधर भवाऱ, प्रज्ञा म्हात्रेकल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये आम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच हवे आहे. विभागीय संमेलनाची मसापच्या जिल्हा प्रतिनिधींची भूमिका आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्टोक्ती कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व कवी राजीव जोशी यांनी केली. सांस्कृतिक नगरी असलेल्या कल्याण-डोंबिवलीत केव्हाच साहित्य संमेलन व्हायला हवे होते. तशी मागणी आतापर्यंत का केली गेली नाही, याबाबत अनेक प्रतिथयश साहित्यिकांनी आश्चर्य व्यक्त केले.जोशी म्हणाले की, आमच्या संस्थेने अ. भा. साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आमचा विभागीय साहित्य संमेलनास ठाम विरोध आहे. संमेलन कार्यकारिणीचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश देशपांडे यांनी कल्याणमध्ये संमेलन व्हावे या मागणीला दुजोरा देतानाच अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले नाही तर किमान विभागीय साहित्य संमेलन तरी व्हावे, अशी कचखाऊ भूमिका ‘लोकमत’कडे व्यक्त केली होती. जोशी यांनी सांगितले की, कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय १५० वर्षाचे आहे. कल्याणला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. कल्याणचा गायन समाजही तितकाच जुना आहे. कल्याणमध्ये अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्था आहेत. त्यामुळे त्याठिकाणी विभागीय संमेलन घेऊन काय उपयोग? कोमसापचे विभागीय संमेलन आम्ही केव्हाही घेऊ शकतो. कवीवर्य अशोक बागवे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत जिल्हा प्रतिनिधींनी काही केलेले नाही. परंतु डोंबिवलीत साहित्य संमेलन व्हायला हरकत नाही. कल्याणच्या वाचनालयाचे सरचिटणीस व लेखक भिकू बारस्कर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सार्वजनिक वाचनालयातर्फे साहित्य संमेलन कल्याणमध्ये व्हावे अशी मागणी केली जात आहे. पहिल्या वर्षी आमच्या अर्जाचा विचारच केला गेला नाही. त्यानंतर संमेलनासाठी पंजाबमधील घुमानची निवड झाली. त्यावेळी प्रतिनिधी कल्याणला पाठवू असे कार्यकारिणीकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात प्रतिनिधी पाठविलाच गेला नाही. गेल्या वर्षीचे संमेलन पिंपरी-चिंचवडला झाले. आमच्या मागणीचा विचार तिसऱ्या वेळीही करण्यात आला नाही. आता पुन्हा मागणी केली आहे.आम्ही आमचा संमेलन आयोजनाचा हट्ट सोडलेला नाही.कवी व लेखक डॉ. महेश केळुस्कर म्हणाले की, साहित्य संमेलनाचा खर्च वाढतच चालल्याने आयोजकांवर एकीकडे दडपण येत असताना दुसरीकडे आयोजनाकरिता स्पर्धा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलन व्हावे ही मागणी रास्त आहे. संमेलनाचा वाढता खर्च पाहता ज्यांच्यात ते यशस्वी करून दाखवण्याची धमक आहे अशा तरुणांनी मसापच्या जिल्हा प्रतिनिधीपदी निवडून यायला हवे. अनेक संस्था संमेलनाच्या अर्थकारणाला घाबरुन जबाबदारी घेत नाहीत. येथे वेगळे चित्र आहे. साहित्य संमेलनाच्या अर्थव्यवहारात आणि संमेलनाच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण होणे हेही गरजेचे आहे. कल्याण याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष दिलीप बल्लाळ यांनीही संमेलन आयोजनाच्या मागणीस पाठिंबा दिला. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. >साहित्यिक सतीश सोळांकुरकर यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीमध्ये पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्याची मागणी इतके वर्षे का केली नाही याचे आश्चर्य वाटते. साहित्य संमेलनाचा आग्रह जिल्हा प्रतिनिधींनी धरायला हवा होता. शहरात संमेलनाला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. सांस्कृतिक परंपराही जपलेली आहे. त्यामुळे कुठेतरी जिल्हा प्रतिनिधीच कमी पडले आहेत, अशी तिरकस आणि कडवट टीकाही त्यांनी केली आणि आतातरी संमेलनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.