शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

शाहू विचारांतच सर्व उत्तरे

By admin | Updated: June 27, 2016 04:58 IST

देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत.

कोल्हापूर : देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत. त्यांनी देशातील परिवर्तनाच्या चळवळीला दृष्टी देण्याचे काम केले. असा थोर राजा या नगरीमध्ये होऊन गेला हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी शाहू विचारांचा गौरव केला. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘शाहू’ पुरस्कार पवार यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते. पवार यांना पुरस्कार देताना सारे सभागृह उठून उभे राहिले व टाळ्यांच्या गजरातच या लोकनेत्याचा जनतेने गौरव केला. मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात पवार यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पटच श्रोत्यांसमोर उभा केला. ते म्हणाले, शाहूंनी १९०२मध्ये आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आज शंभर वर्षांनंतरही आणि देशात लोकशाही असतानाही आपल्याला तसा निर्णय घेता आलेला नाही. दलित आणि उपेक्षित वर्गाचे कल्याण हेच त्यांच्या एकूण जीवितकार्याचे ध्येय राहिले, असे सांगून पवार म्हणाले, हा माणूस राजा होता, अवलिया होता की आणखी कोण होता, हे समजतच नाही. त्यांचे मन कधीच राजवाड्यात रमले नाही. गोरगरिबांच्या झोपडीतील खर्डा-भाकर यातच त्यांनी जास्त आनंद मानला. त्यांनी जो विचार जोपासला, प्रशासकीय पद्धती राबवली, ती अभ्यासली तर त्यामध्ये देशातील आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्की सापडतील, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राजर्र्षी शाहूंनी जे मांडले तेच पवार जगले, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा गौरव केला. मंत्री पाटील म्हणाले, काही व्यक्ती पुरस्कारांची उंची वाढवतात, तसेच आज या पुरस्काराचे झाले आहे. देशातील साखर उद्योग मोठा करण्याचे श्रेय हे पवार यांनाच जाते. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना जी कर्जमुक्ती झाली त्याचे सारे श्रेय पवार यांनाच जाते. राजकारणात त्यांनी भूमिका घेतल्या तरी त्याच्या तळाशी सामान्य माणसाचे हितच राहिले.राजर्षी शाहू महाराज व पवार यांच्या कार्यामध्ये अनेक ठिकाणी साम्य असलेले पैलू दिसतात. अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जात आहे याचा विशेष आनंद असल्याचे श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितले. पुरस्काराची रक्कम रयत शिक्षण संस्थेला शरद पवार यांनी पुरस्काराच्या एक लाखाच्या रकमेत पवार ट्रस्टचे आणखी चार लाख रुपये घालून ही रक्कम रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्याकडे सुपुर्द केली व ‘रयत’च्या येथील शाहू कॉलेजला ही रक्कम द्यावी, अशी सूचना पवार यांनी केली.