शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

खून खटल्यात सर्व आरोपी निर्दोष

By admin | Updated: February 18, 2016 06:57 IST

माहीमच्या कापड बाजार भागातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात झालेल्या राजेंद्र गुप्ता या व्यापाऱ्याच्या खुनाबद्दलच्या खटल्यात सर्व पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयानेही निर्दोष मुक्तता केल्याने

मुंबई : माहीमच्या कापड बाजार भागातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात झालेल्या राजेंद्र गुप्ता या व्यापाऱ्याच्या खुनाबद्दलच्या खटल्यात सर्व पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयानेही निर्दोष मुक्तता केल्याने या खटल्याची २० वर्षांनी कोणालाही शिक्षा न होता सांगता झाली आहे.राजकीय कार्यकर्ते असलेले गुप्ता त्यांच्या दुकानाच्या समोरच गणपती मंडपात मंडप कंत्राटदार राजाराम सरफरे यांच्याशी बोलत बसले असता १२ आॅगस्ट १९९५ रोजी भर दुपारी दोघांनी गोळ््या झाडून त्यांचा खून केला होता. पोलिसांनी या खटल्यात तब्बल पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उभे केले होते. परंतु अभियोग पक्षाच्या इतर उणिवा व त्रुटींसह या सर्वांची साक्ष न्यायालायने विश्वासार्ह न मानल्याने आरोपी निर्दोष सुटले.एकूण १३ आरोपींवर हा खटला दाखल केला गेला होता. त्यापैकी सहा आरोपी खटला प्रलंबित असताना मरण पावले किंवा फरार झाले. सत्र न्यायालयाने सैयद उमर सैयद अब्बास, आबिद उस्मान खान, मोहम्मद इब्राहिम आदम हुसैन, सरदार अली सफदर अली खान आणि मोहम्मद शब्बीर मिर्झा कासीम या पाच आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली व दोन आरोपींना निर्दोष सोडले. मात्र या पाच आरोपींना पुढे उच्च न्यायालायने अपिलात निर्दोष मुक्त केले. याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले.गोळीबारात जखमी झालेल्या राजाराम सरफरेखेरीज हेमंत परशुराम अक्रे, गणेश, राजेश तानाजी अक्रे आणि किशोर मणिलाल दमाणिया हे या खटल्यातील पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. विसंगती व त्रुटींमुळे यांच्या साक्षींवरून हा खून आरोपींनीच केला हे नि:संदिग्धपणे सिद्ध होत नाही. शिवाय आरोपींची दोन वेळा घेतलेली ओळख परेडही सदोष होती, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. (विशेष प्रतिनिधी)