शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

इंद्रायणीच्या रक्षणार्थ आळंदी पालिकेचा उपक्रम ठरला विदायक

By admin | Updated: September 19, 2016 17:28 IST

प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठाम पणे उभे राहिल्या नंतर काय घडू शकते याचा प्रत्यय सद्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.

श्रीकांत बोरावके :

आळंदी, दि. १९ : प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठाम पणे उभे राहिल्या नंतर काय घडू शकते याचा प्रत्यय सद्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.केवळ दुसऱ्यावर बोट उचलत बसण्यापेक्षा आपणही झालेल्या दुरावस्थेस कुठेतरी जबाबदार आहोत आणि ती दुरावस्था दूर करण्यासाठी आपलंही कार्य विदायक हवे या विचाराने प्रेरित होत येथील नगर परिषद प्रशासनाने यंदा इंद्रायणीत मूर्ती विसर्जित न करू देता नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याचा उपक्रम आखला.इंद्रायणी प्रदूषित होण्यामागे पिंपरी चिंचवड महानगर पालिकाच जबादार आहे व त्याबाबत ठोस भूमिका घेणाऱ्या आळंदी पालिकेने आपल्या भागात होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालायचा असा चंगच बांधला आणि त्याचा श्री गणेशा साक्षात गणरायाच्या मूर्ती इंद्रायणीचीच्या पाण्यात विघटीत होऊ न देण्यापासूनच केला.त्याचा हा उपक्रम विदायक ठरत असून क वर्ग दर्जातील पालिकांमध्ये उल्लेखनीय ठरत आहे.याचे सर्वस्वी श्रेय अवघ्या सहा महिन्यांपासून येथील मुख्याधिकारी पदावर रुजू झालेलं डॉ.संतोष टेंगले,नगराध्यक्ष रोहिदास तापकीर व इतर लोकप्रतिनिधींचे आहे.

पालिकेने यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव राबविण्याचे आवाहन केले होते.इंद्रायणी नदी काठी कृत्रीम तलाव ही उभारण्यात आला होता.परंतु तलाव व हौद उभारत हात वर करून आपली नैतिक जबादारी न झटकता तो उपक्रम प्रभावी पणे राबविण्यात पालिकेने कार्य खरे कौतुकास्पद आहे.इंद्रायणी नदी घाटावर दगडी बांधकाम आहे.अंदाजे चारशे पाचशे मीटरचा हा घाट आहे.येथील परिसरातील सार्वधिक मुर्त्या याच घाट परिसरात विसर्जित केल्या जातात पालिकेच्या वतीने येथे विसर्जनाच्या वेळी स्वंयसेवक नेमण्यात आले होते.हे स्वंयसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते.परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.

भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वंयसेवक स्वतः पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते.यामुळे भाविकांची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती व संयसेवका मार्फत नदीचे पावित्र्य.इंद्रायणी नदी घाटाच्या दोन्ही बाजूस शंभरच्या आसपास स्वंसेवक नेमण्यात आले होते.यात पालिकेचे कर्मचारी,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व माईस एमआयटीचे विद्यार्थी,पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते,आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व इतर सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस मित्र व विद्यार्थ्यांना पांडुरंग वाहिले यांच्याकडून पांढऱ्या रंगाचे टीशर्ट उपलब्ध करून देण्यात आले होते.त्यामुळे या पांढऱ्या रंगाच्या पोषाखात या मोहिमेला शिस्तबद्धता आली होती.या सर्वांमार्फत सातव्या व अकराव्या दिवशी मूर्ती पाण्याबाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत आठ ते नऊ हजार मुर्त्या पाण्याबाहेर काढण्यात आल्या.या सर्व मुर्त्या आपल्या ताब्यात घेत पालिकेने त्यांचे कृत्रिम विघटन केले.त्यांचा हा उपक्रम प्रभावी ठरला असून यंदाच्या गणेशोत्सवात इंद्रायणीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात आळा घालत यश आले आहे.केवळ हौदच नव्हे तर थेट नदीतूनही विसर्जीत पाण्याबाहेर काढत पालिकेने पर्यावरण पूरक विसर्जनाची मोहीम यशस्वी करून दाखविली आहे.तुम्ही तुमची श्रद्धा जपा आम्ही आमच कर्तव्य जपतो विसर्जनाच्या वेळी स्वंयसेवक नेमण्यात आले होते.हे स्वंयसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते.परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वंयसेवक स्वतः पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते.यामुळे भाविकांची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती व संयसेवका मार्फत नदीचे पावित्र्य.