शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

इंद्रायणीच्या रक्षणार्थ आळंदी पालिकेचा उपक्रम ठरला विदायक

By admin | Updated: September 19, 2016 17:28 IST

प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठाम पणे उभे राहिल्या नंतर काय घडू शकते याचा प्रत्यय सद्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.

श्रीकांत बोरावके :

आळंदी, दि. १९ : प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठाम पणे उभे राहिल्या नंतर काय घडू शकते याचा प्रत्यय सद्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.केवळ दुसऱ्यावर बोट उचलत बसण्यापेक्षा आपणही झालेल्या दुरावस्थेस कुठेतरी जबाबदार आहोत आणि ती दुरावस्था दूर करण्यासाठी आपलंही कार्य विदायक हवे या विचाराने प्रेरित होत येथील नगर परिषद प्रशासनाने यंदा इंद्रायणीत मूर्ती विसर्जित न करू देता नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याचा उपक्रम आखला.इंद्रायणी प्रदूषित होण्यामागे पिंपरी चिंचवड महानगर पालिकाच जबादार आहे व त्याबाबत ठोस भूमिका घेणाऱ्या आळंदी पालिकेने आपल्या भागात होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालायचा असा चंगच बांधला आणि त्याचा श्री गणेशा साक्षात गणरायाच्या मूर्ती इंद्रायणीचीच्या पाण्यात विघटीत होऊ न देण्यापासूनच केला.त्याचा हा उपक्रम विदायक ठरत असून क वर्ग दर्जातील पालिकांमध्ये उल्लेखनीय ठरत आहे.याचे सर्वस्वी श्रेय अवघ्या सहा महिन्यांपासून येथील मुख्याधिकारी पदावर रुजू झालेलं डॉ.संतोष टेंगले,नगराध्यक्ष रोहिदास तापकीर व इतर लोकप्रतिनिधींचे आहे.

पालिकेने यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव राबविण्याचे आवाहन केले होते.इंद्रायणी नदी काठी कृत्रीम तलाव ही उभारण्यात आला होता.परंतु तलाव व हौद उभारत हात वर करून आपली नैतिक जबादारी न झटकता तो उपक्रम प्रभावी पणे राबविण्यात पालिकेने कार्य खरे कौतुकास्पद आहे.इंद्रायणी नदी घाटावर दगडी बांधकाम आहे.अंदाजे चारशे पाचशे मीटरचा हा घाट आहे.येथील परिसरातील सार्वधिक मुर्त्या याच घाट परिसरात विसर्जित केल्या जातात पालिकेच्या वतीने येथे विसर्जनाच्या वेळी स्वंयसेवक नेमण्यात आले होते.हे स्वंयसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते.परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.

भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वंयसेवक स्वतः पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते.यामुळे भाविकांची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती व संयसेवका मार्फत नदीचे पावित्र्य.इंद्रायणी नदी घाटाच्या दोन्ही बाजूस शंभरच्या आसपास स्वंसेवक नेमण्यात आले होते.यात पालिकेचे कर्मचारी,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व माईस एमआयटीचे विद्यार्थी,पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते,आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व इतर सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस मित्र व विद्यार्थ्यांना पांडुरंग वाहिले यांच्याकडून पांढऱ्या रंगाचे टीशर्ट उपलब्ध करून देण्यात आले होते.त्यामुळे या पांढऱ्या रंगाच्या पोषाखात या मोहिमेला शिस्तबद्धता आली होती.या सर्वांमार्फत सातव्या व अकराव्या दिवशी मूर्ती पाण्याबाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत आठ ते नऊ हजार मुर्त्या पाण्याबाहेर काढण्यात आल्या.या सर्व मुर्त्या आपल्या ताब्यात घेत पालिकेने त्यांचे कृत्रिम विघटन केले.त्यांचा हा उपक्रम प्रभावी ठरला असून यंदाच्या गणेशोत्सवात इंद्रायणीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात आळा घालत यश आले आहे.केवळ हौदच नव्हे तर थेट नदीतूनही विसर्जीत पाण्याबाहेर काढत पालिकेने पर्यावरण पूरक विसर्जनाची मोहीम यशस्वी करून दाखविली आहे.तुम्ही तुमची श्रद्धा जपा आम्ही आमच कर्तव्य जपतो विसर्जनाच्या वेळी स्वंयसेवक नेमण्यात आले होते.हे स्वंयसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते.परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वंयसेवक स्वतः पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते.यामुळे भाविकांची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती व संयसेवका मार्फत नदीचे पावित्र्य.