शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

अकोलाही बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:32 IST

एचएसआरसीने केला उपयुक्तता अहवाल तयार : मुंबई-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेनची चाचपणी

राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: संपूर्ण देशामध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, देशातील काही प्रमुख मार्गाबाबत हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ( एचएसआरसी ) उपयुक्तता अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये मुंबई - नागपूर मार्गाचाही समावेश आहे. या मार्गासंदर्भात तयार करण्यात आलेला उपयुक्तता अहवाल आॅक्टोबरमध्ये सादर होणार असून,हा अहवाल स्वीकारल्या गेल्यास अकोला शहर बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.एचएसआरसी अनेक देशांसोबत बुलेट ट्रेनबाबत काम करीत आहे. केंद्र सरकारने देशातील सहा महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबत नियोजन केले असून, या मार्र्गावर बुलेट ट्रेन धावू शकेल काय? याची चाचपणी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी एचएसआरसीला दिली आहे. एचएसआरसीने मुंबई-नागपूर या मार्गाच्या उपयुक्ततेबाबतचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आॅक्टोबरमध्ये रेल्वे मंत्रालयाला सोपविला जाणार असल्याची माहिती आहे. या मार्गावरील स्थानकांमध्ये नाशिक, औरंगाबाद, अकोला व अमरावतीचा समावेश करण्यात आला आहे; मात्र अकोला ते औरंगाबाद दरम्यान मार्ग कसा असेल, याबाबतची माहिती एचएसआरसीने उघड केली नसल्याने या मार्गाबाबतची उत्सुकता कायम आहे. मुंबई-नागपूर व्हाया औरंगाबादमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा मार्ग ठरविताना एचएसआरसीने औरंगाबाद शहरालाही याच मार्गावर आणण्याची संकल्पना मांडली आहे. या मार्गावर नाशिक, औरंगाबाद, अकोला व अमरावती असे स्थानके संकल्पीत केली आहेत. त्यामुळे विद्यमान मध्यरेल्वे मार्गावरील नाशिक ते अकोला दरम्यानची महत्त्वाची शहरे बुलेट ट्रेनला मुकणार आहेत. मराठवाड्याला विदर्भ जोडणारमध्यरेल्वेच्या विद्यमान मार्गानेच बुलेट ट्रेन धावल्यास अकोला-औरंगाबाद या मार्गासाठी नव्याने चाचपणी करण्याची गरज नव्हती; मात्र महत्त्वाची शहरे या ट्रेनच्या मार्गावर आणताना विदर्भासोबतच मराठवाडाही जोडण्याची एचएसआरसीची योजना आहे. अकोला ते औरंगाबाद या मार्गासाठी शेगाव स्थानकावरून खामगाव, जालना व पुढे औरंगाबाद असा पर्याय समोर येऊ शकतो.