शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 24, 2014 00:42 IST

कोणत्याही विभागाचा विकास करण्यासाठी त्या भागातील दळणवळणाची साधने सक्षम असणे आवश्यक असते. त्यामुळे अकोला विमानतळ विस्तारीकरणात येत असलेले सर्व अडथळे दूर करून

अडथळे दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील आमदारांची लक्षवेधी नागपूर : कोणत्याही विभागाचा विकास करण्यासाठी त्या भागातील दळणवळणाची साधने सक्षम असणे आवश्यक असते. त्यामुळे अकोला विमानतळ विस्तारीकरणात येत असलेले सर्व अडथळे दूर करून विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. अकोला जिल्ह्यातील आमदारांनी लक्षवेधीद्वारे विमानतळाच्या विस्तारीकरणाची मागणी केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी शासन विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत सकारात्मक भूमिकेत असल्याचे सांगितले. अकोला विमानतळाच्या विस्ताराची मागणी गत दहा वर्षांपासून करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला हे महत्त्वाचे शहर असून, संतनगरी शेगाव येथे दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच नरनाळा किल्ला व चिखलदरा येथून जवळ असल्यामुळे पर्यटकही येत असल्याने विमानतळाचा विस्तार आवश्यक आहे. मात्र, विस्तारीकरणासाठी जागा देण्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जागा देण्यास नकार देऊन खोडा घातला आहे. त्यामुळे या विमानतळाचा विस्तार करण्यातील अडचणी दूर करण्याची मागणी अकोला पूर्वचे आ. रणधीर सावरकर यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अकोला विमानतळाचे विस्तारीकरण अत्यंत गरजेचे असून, शासनाची त्याबाबत भूमिका सकारात्मक आहे. मात्र, विमानतळ विस्तारीकरणाबाबत एका प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी उच्च न्यायालयात शासन सक्षम बाजू मांडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आ. गोवर्धन शर्मा यांनी अकोल्याच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी आला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे विस्तार रखडला आहे. अधिकाऱ्यांनी घातलेला खोडा दूर करणार काय? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्याबरोबर विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात करू, असे सांगितले. यावेळी आ. हरीश पिंपळे यांनीही अकोल्याच्या विकासाकरिता विमानतळ आवश्यक असून, यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अडथळा आणत असल्याचे सांगितले. तसेच अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी या विमानतळावर तत्काळ विमानसेवा सुरू का करण्यात येत नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धावपट्टी छोटी असल्यामुळे विमान उतरविता येत नाही. विस्तारीकरणानंतर विमानसेवा सुरू करू, असे सांगितले. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनीही विमानतळावरून अमरावती विमानतळाप्रमाणेच दिवस-रात्र विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विमानतळ विस्तारीकरणानंतर तशी सेवा सुरू करू, असे आश्वासन दिले.विधानसभेतील सदस्य सर्वश्री रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांनी लक्षवेधी मांडली होती. (प्रतिनिधी)