शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना तूर्तास दिलासा

By admin | Updated: June 4, 2015 12:11 IST

राज्यातील सिंचन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तूर्तास दिलासा मिळाला असून सध्या त्यांना चौकशीसाठी एसीबीमध्ये (अँटी करप्शन ब्युरो) प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ४ - राज्यातील सिंचन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तूर्तास दिलासा मिळाला असून सध्या त्यांना चौकशीसाठी एसीबीमध्ये (अँटी करप्शन ब्युरो) प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंचन घोटळ्यावरून रान उठवणा-या भाजप सरकारने आता मात्र या मुद्यावर सौम्य भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी अजित पवार यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही, त्यांनी एसीबीला लेखी उत्तर दिले तरी चालेल अशी मुभा त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे एसीबीला आता त्यांना पुन्हा समन्स बजावण्याबाबत विचार करावा लागेल. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबीला पवार व तटकरेंच्या चौकशीसाठी परवानगी दिल्यानंतर एसीबीने पवारांना समन्स बजावले होते. मात्र पवार यांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. राज्याबाहेर असल्याने आपण चौकशीस उपस्थित राहू शकलो नव्हतो, असं स्पष्टीकरणही त्यांनी तेव्हा दिलं होतं.