शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

टीका करणे हा अजित पवार यांचा धंदा

By admin | Updated: September 7, 2015 00:57 IST

कोणतीही घटना घडली किंवा दुष्काळाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हा अजित पवार यांचा धंदाच बनला आहे,

पिंपरी : कोणतीही घटना घडली किंवा दुष्काळाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हा अजित पवार यांचा धंदाच बनला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे रविवारी केली.पिंपरी-चिंचवड शहरातील एका कार्यक्रमास दानवे आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री अकार्यक्षम असल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. याबाबत विचारले असता, दानवे यांनी पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.ते म्हणाले की, भाजपा सरकारच्या कालखंडात अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ ही तीन संकटे आली. मात्र यांच्या निवारणासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची परिस्थिती अतिशय तत्परतेने हाताळली आहे. दुष्काळ निवारणासाठी कधीही पैसे कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज घेऊ, मात्र शेतकऱ्यांना मदत करू.