शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

ऐन दिवाळीतच व्यापाऱ्यांचा बंद?

By admin | Updated: October 19, 2016 04:06 IST

फेरिवाल्यांच्या विरोधात येथील व्यापारी आक्रमक झाल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

ठाणे : रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरिवाल्यांच्या विरोधात येथील व्यापारी आक्रमक झाल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सोमवारी व्यापारी आणि येथील अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याने त्याचे पडसाद समस्त व्यापारी वर्गात उमटून सुमारे २०० दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यानंतर आता या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांची भेट घेऊन या फेरीवाल्यांवर अंकुश बसविण्याची मागणी केली. या भेटीनंतर आता पालिकेने मंगळवारी सकाळपासून येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. परंतु, येथील रिक्षा स्टँडवर अद्यापही कारवाई न झाल्याने व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, तरीही दिवाळी आधी यावर ठोस उपाय योजना करावी अन्यथा दिवाळीनंतर या भागातील बंदचा इशारा या व्यापाऱ्यांनी दिला आहे. रस्ता रु ंदीकरणासाठी मालकीची जागा देऊनही ठाणे महापालिकेने आपले आश्वासन पूर्ण न केल्याने या भागात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर याची दखल घेऊन आयुक्तांनी या भागात फेरीवाले बसू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय मुख्य रास्ता मोकळा ठेऊन त्यांच्या बाजूला ज्या गल्ल्या आहेत त्यामध्ये केवळ नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसता येणार असल्याचेही सांगितले आहे. या रस्त्यावर बसणाऱ्या फेरिवाल्यांना हटवण्यासाठी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दोन गाड्या गस्त घालणार आहेत, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. फेरीवाल्यांबरोबरच येथील अनिधकृत रिक्षा स्टँडदेखील हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतरही सोमवारी या भागात फेरीवाला आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. फेरीवाल्याने, व्यापाऱ्याला धमकी दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्व व्यापाऱ्यांमध्ये पसरले आणि येथील सुमारे २०० व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करुन या फेरीवाल्यांना कारवाईची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांची देखील भेट घेऊन या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी तत्काळ आयुक्त संजीव जयस्वाल यांना दूरध्वनीद्वारे झाल्या प्रकाराची माहिती देऊन कारवाईची मागणी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>फेरीवाल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमकआयुक्तांनी येत्या आठ ते दहा दिवसात या भागात बदल झालेले दिसतील, असे आश्वासन दिले. तसेच फेरिवाल्यांवरदेखील कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक या रस्त्यावर टेहाळणी करीत असून अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करीत होते. पालिकेने जरी ही कारवाई केली असली तरीदेखील येथील अनधिकृत रिक्षा स्टँडवर वाहतूक पोलिसांनी का कारवाई केली नाही, असा सवाल मात्र येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.