शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

ऐन दिवाळीतच व्यापाऱ्यांचा बंद?

By admin | Updated: October 19, 2016 04:06 IST

फेरिवाल्यांच्या विरोधात येथील व्यापारी आक्रमक झाल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

ठाणे : रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरिवाल्यांच्या विरोधात येथील व्यापारी आक्रमक झाल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सोमवारी व्यापारी आणि येथील अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याने त्याचे पडसाद समस्त व्यापारी वर्गात उमटून सुमारे २०० दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यानंतर आता या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांची भेट घेऊन या फेरीवाल्यांवर अंकुश बसविण्याची मागणी केली. या भेटीनंतर आता पालिकेने मंगळवारी सकाळपासून येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. परंतु, येथील रिक्षा स्टँडवर अद्यापही कारवाई न झाल्याने व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, तरीही दिवाळी आधी यावर ठोस उपाय योजना करावी अन्यथा दिवाळीनंतर या भागातील बंदचा इशारा या व्यापाऱ्यांनी दिला आहे. रस्ता रु ंदीकरणासाठी मालकीची जागा देऊनही ठाणे महापालिकेने आपले आश्वासन पूर्ण न केल्याने या भागात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर याची दखल घेऊन आयुक्तांनी या भागात फेरीवाले बसू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय मुख्य रास्ता मोकळा ठेऊन त्यांच्या बाजूला ज्या गल्ल्या आहेत त्यामध्ये केवळ नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसता येणार असल्याचेही सांगितले आहे. या रस्त्यावर बसणाऱ्या फेरिवाल्यांना हटवण्यासाठी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दोन गाड्या गस्त घालणार आहेत, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. फेरीवाल्यांबरोबरच येथील अनिधकृत रिक्षा स्टँडदेखील हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतरही सोमवारी या भागात फेरीवाला आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. फेरीवाल्याने, व्यापाऱ्याला धमकी दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्व व्यापाऱ्यांमध्ये पसरले आणि येथील सुमारे २०० व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करुन या फेरीवाल्यांना कारवाईची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांची देखील भेट घेऊन या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी तत्काळ आयुक्त संजीव जयस्वाल यांना दूरध्वनीद्वारे झाल्या प्रकाराची माहिती देऊन कारवाईची मागणी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>फेरीवाल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमकआयुक्तांनी येत्या आठ ते दहा दिवसात या भागात बदल झालेले दिसतील, असे आश्वासन दिले. तसेच फेरिवाल्यांवरदेखील कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक या रस्त्यावर टेहाळणी करीत असून अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करीत होते. पालिकेने जरी ही कारवाई केली असली तरीदेखील येथील अनधिकृत रिक्षा स्टँडवर वाहतूक पोलिसांनी का कारवाई केली नाही, असा सवाल मात्र येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.