शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

नाशिकच्या तब्बल ५० हजार शेळ्या-मेंढ्यांचा थेट दुबईपर्यंत हवाई प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:39 IST

तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.

ठळक मुद्देनाशिकमधून ५० हजार शेळ्या-मेंढ्या दुबईलाओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयारपावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद

नाशिक : विमानसेवेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक करणे सर्वश्रुत आहे. मात्र नाशिकच्या एका उद्योजकाने तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.सामान्यत: विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी असते. कार्गो सेवेत जीवित प्राणी नेण्याचा प्रकार सहसा नसतोच, परंतु नाशिकच्या कार्गो सेवेतून मात्र प्रथमच शेळ्या व मेंढ्या पाठविण्यात आल्या. नाशिकच्या सानप अ‍ॅग्रो कंपनीचे जयंत सानप आणि हेमंत सानप या दोघा बंधूंनी हा प्रयोग केला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सानप बंधू तसे सधन कुटुंबातील आहेत. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय फळे आणि भाजीपाल्याची ते निर्यातही करतात. मात्र, दुबईत व्यवसायासाठी गेल्यानंतर तेथे शेळ्या, मेंढ्यांची वाढलेली मागणी आणि नेमके त्याचवेळी पावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद होत असल्याने गेल्या वर्षी प्रथमच हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्या पाठविण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी सजिद लॉजिस्टीक या कंपनीची मदत घेतली. भारतीय विमानपत्तन प्राधीकरण आणि अन्य परवानग्या मिळवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. नाशिकमध्ये ओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर होत नसला तरी सानप बंधूंनी त्याचा वापर करण्याचे ठरविले. या कामासाठी दुबईतून मालवाहतूक करणारे विमान भाड्याने घेण्यात आले आणि गेल्यावर्षी प्रथमच विमानातून जिवंत शेळ्या, मेंढ्यांची वाहतूक करून त्यांना दुबईत पोहोचवण्याचे काम सानप बंधूंनी केले. समुद्रमार्गे म्हणजे जहाजातून जनावरे नेताना त्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. शिवाय पाच ते सहा दिवसांनी जनावरे पोहोचत असतात. येथे मात्र विमानसेवेमुळे अवघ्या चार तासांत दुबई गाठणे शक्य होत असते. शिवाय एकही शेळी किंवा मेंढी दगावत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुरेशी तयारी करूनही केवळ ५० हजार शेळ्या व मेंढ्यांची वाहतूक करता आल्याचे हेमंत सानप यांनी सांगितले. नाशिकच्या विमानतळावर अपेक्षित उंचीचे हायलोडर नसल्याने विमानही मर्यादित उंचीचेच यंदा आणावे लागले. त्यामुळे ३४ फेºया करूनही केवळ ५० हजार शेळ्या, मेंढ्यांची निर्यात करता आली. हाय लोडर आणि अन्य अडचणी दूूर झाल्यास वर्षभर ही सेवा सुरूच ठेवण्याचा मानस असल्याचे सानप यांचे म्हणणे आहे.