शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नाशिकच्या तब्बल ५० हजार शेळ्या-मेंढ्यांचा थेट दुबईपर्यंत हवाई प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:39 IST

तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.

ठळक मुद्देनाशिकमधून ५० हजार शेळ्या-मेंढ्या दुबईलाओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयारपावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद

नाशिक : विमानसेवेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक करणे सर्वश्रुत आहे. मात्र नाशिकच्या एका उद्योजकाने तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.सामान्यत: विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी असते. कार्गो सेवेत जीवित प्राणी नेण्याचा प्रकार सहसा नसतोच, परंतु नाशिकच्या कार्गो सेवेतून मात्र प्रथमच शेळ्या व मेंढ्या पाठविण्यात आल्या. नाशिकच्या सानप अ‍ॅग्रो कंपनीचे जयंत सानप आणि हेमंत सानप या दोघा बंधूंनी हा प्रयोग केला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सानप बंधू तसे सधन कुटुंबातील आहेत. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय फळे आणि भाजीपाल्याची ते निर्यातही करतात. मात्र, दुबईत व्यवसायासाठी गेल्यानंतर तेथे शेळ्या, मेंढ्यांची वाढलेली मागणी आणि नेमके त्याचवेळी पावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद होत असल्याने गेल्या वर्षी प्रथमच हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्या पाठविण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी सजिद लॉजिस्टीक या कंपनीची मदत घेतली. भारतीय विमानपत्तन प्राधीकरण आणि अन्य परवानग्या मिळवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. नाशिकमध्ये ओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर होत नसला तरी सानप बंधूंनी त्याचा वापर करण्याचे ठरविले. या कामासाठी दुबईतून मालवाहतूक करणारे विमान भाड्याने घेण्यात आले आणि गेल्यावर्षी प्रथमच विमानातून जिवंत शेळ्या, मेंढ्यांची वाहतूक करून त्यांना दुबईत पोहोचवण्याचे काम सानप बंधूंनी केले. समुद्रमार्गे म्हणजे जहाजातून जनावरे नेताना त्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. शिवाय पाच ते सहा दिवसांनी जनावरे पोहोचत असतात. येथे मात्र विमानसेवेमुळे अवघ्या चार तासांत दुबई गाठणे शक्य होत असते. शिवाय एकही शेळी किंवा मेंढी दगावत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुरेशी तयारी करूनही केवळ ५० हजार शेळ्या व मेंढ्यांची वाहतूक करता आल्याचे हेमंत सानप यांनी सांगितले. नाशिकच्या विमानतळावर अपेक्षित उंचीचे हायलोडर नसल्याने विमानही मर्यादित उंचीचेच यंदा आणावे लागले. त्यामुळे ३४ फेºया करूनही केवळ ५० हजार शेळ्या, मेंढ्यांची निर्यात करता आली. हाय लोडर आणि अन्य अडचणी दूूर झाल्यास वर्षभर ही सेवा सुरूच ठेवण्याचा मानस असल्याचे सानप यांचे म्हणणे आहे.