शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आॅन ड्युटी १९२ तास

By admin | Updated: March 12, 2016 04:01 IST

सण-उत्सव, मोठे समारंभ, व्हीआयपी बंदोबस्त अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहावे लागते. वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत.

मनीषा म्हात्रे,  मुंबईसण-उत्सव, मोठे समारंभ, व्हीआयपी बंदोबस्त अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहावे लागते. वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत. अशातच सशस्त्र दलातील कर्मचारी वर्ग गेल्या आठ दिवसांपासून विनाकारण आॅन ड्युटी २४ तास राबत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. केवळ वरिष्ठांच्या मनमानी कारभारामुळे या कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.गेल्या आठ दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाच्या वरळी, ताडदेव, नायगाव, कलिना तसेच मरोळ येथील कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. रजा न देणे, पगार वेळेवर नाही अशा तक्रारींना तोंड देत असलेल्या सशस्त्र पोलीस दलाच्या नायगाव येथील कर्मचारी वर्गाला गेल्या आठ दिवसांपासून आॅन ड्युटी २४ तास राबविले जात आहे. ४ मार्चपासून ब्रीच कॅण्डी रुग्णालय, माहुल डम्पिंग यार्डसारख्या बंदोबस्ताच्या ठिकाणी प्रत्येकी २ पोलिसांची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबत कुणाकडे विचारणा केल्यास सशस्त्र पोलीस दलाचे अपर आयुक्त कैसर खालीद यांच्या आदेशाने या ड्युटी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी खालीद यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. संबंधित पोलीस उपायुक्तांकडे कर्मचारी वर्गाला ड्युटी लावण्याची जबाबदारी असल्याचे खालीद यांचे म्हणणे आहे. त्यातही जेथे गरज नाही, अशा ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा अडकवून ठेवण्यात आला आहे. ३ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडील बंदोबस्तात कपात करण्यात आली होती. जास्तीच्या पोलीस बंदोबस्ताची गरज नसल्याने तेथे तैनात असलेल्या २० कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचारी कमी करण्यात आले होते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी वरिष्ठांची फोनाफोनी झाल्याने पुन्हा कपात केलेल्या कर्मचारी वर्गाला तेथे तैनात करण्यात आले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी कर्मचारी वर्गाचा अतिरिक्त फौजफाटा पडून आहे. त्यामुळे जेथे गरज आहे अशा ठिकाणी मात्र उर्वरित पोलिसांवर अतिरिक्त ताण पडतो. माहुल डम्पिंग ग्राउंडसारख्या ठिकाणी हातात एसएलआर घेऊन पोलिसांना एक दिवस थांबणेही कठीण बनते. तरीही जीव मुठीत धरून थांबावे लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. > आपत्कालीन परिस्थिती अथवा ठरावीक बंदोबस्तादरम्यान पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहण्याची वेळ येते. त्यातही जर तो २४ तास काम करत असेल तर दुसऱ्या दिवशी त्याला सुटी दिली जाते. अशात जर कुणाला विनाकारण राबविले जात असेल तर याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलीस प्रवक्ते