शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईच्या अतिउत्साहावर हवा अंकुश

By admin | Updated: August 10, 2014 01:31 IST

अनुराग खापर्डे आणि इशिता मालय यांच्या अपघाती मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. देशाचे भवितव्य असलेली तरुण मुले अपघाताने हरवत असतील तर हा प्रश्न केवळ काही कुटुंबांचाच नव्हे तर

पालकांनी पुढाकार घेण्याची गरज : शिक्षण संस्थातील प्राध्यापकांचीही जबाबदारीअनुराग खापर्डे आणि इशिता मालय यांच्या अपघाती मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. देशाचे भवितव्य असलेली तरुण मुले अपघाताने हरवत असतील तर हा प्रश्न केवळ काही कुटुंबांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा आहे. या युवकांना आम्ही कुठला संस्कार आणि कुठले वातावरण देतो आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. वाईट बाबींना प्रतिष्ठा देणारा समाज आम्ही निर्माण करीत असू तर युवकांना गैर वळण लागणारच. तरुणाई बेधुंद असते पण तरुणाईच्या बेधुंदतेवर अंकुश लावण्याचे आणि त्यांना नियंत्रित करण्याचे काम सर्वात आधी पालकच करू शकतात. यासाठी पालकांनी घरापासून प्रारंभ करण्याची गरज असल्याचे मत समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या व्यक्तिस्वातंत्र्याचे जग आहे. प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जागतिक स्तरावर मान्य करण्यात येत आहे त्यात गैर नाही पण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार आणि मनमानी बोकाळत असेल आणि त्यामुळे आमची तरुण मुले कायमची हिरावणार असतील तर धोक्याची घंटा वाजतेय, हे लक्षात आले पाहिजे. पालकांनी संवाद साधावाप्रत्येक माणूस आज कैवळ पैशाच्या आणि भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. यामुळे घरातील संवाद संपला आहे. मुलांवर असलेला फाजील विश्वासही तरुणाईला मोकाट सोडणारा आहे. आपला मुलगा किंवा मुलगी याचे मित्रमैत्रिणी कोण, त्यांची पार्श्वभूमी काय? याची माहिती पालकांना नसते. आपले पाल्य कुठे जातात आणि काय करतात याचीही माहिती पालकांना नसते. भाबडेपणाने विश्वास ठेवून पालक मुलांना मोकळे सोडतात आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो. मुलांना मोकळे सोडायला हरकत नाही पण पालकांचे किमान त्यांच्यावर लक्ष असले पाहिजे. घरातला संवाद संपत चालल्याने काय चांगले आणि काय वाईट याचा फरक तरुणाईला कळेनासा झाला आहे. पालक आपल्या नोकरी, व्यवसायात गुंतले असल्याने मुलांच्या गरजा पूर्ण करण्यातच पालकांना समाधान वाटते. त्यात हाती पैसा आणि मोकळेपणा मिळाल्याने युवक व्यसनाधीन होत आहेत आणि यात युवतींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे, कुणालाही न जुमानणे, कायद्याची भीती नसणे अशा बाबी त्यामुळेच घडत आहेत. मुलांच्या गरजा पूर्ण करताना त्यांना केवळ पैसे देऊन काम भागणारे नाही. मुलांशी संवाद साधला गेला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींशी घरच्यांचेही सौहार्द्राचे संबंध असले पाहिजे. यात कुणी मित्र वा मैत्रिण खटकणारी असेल तर मुलांशी त्यांच्याशी असणारी मैत्री नियंत्रित करण्याचा प्रयत्न पालक करू शकतात. (प्रतिनिधी)