शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागारांना हवा प्रधान सचिवाचा दर्जा

By admin | Updated: September 12, 2015 02:22 IST

गेल्या १० महिन्यांपासून जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याने जवळपास ५० टक्के अधिकारी कर्मचारी ‘आयडियल’ आहेत. तरीही जलसंपदा विभागाला निवृत्त अधिकारी

- अतुल कुलकर्णी,  मुंबई गेल्या १० महिन्यांपासून जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याने जवळपास ५० टक्के अधिकारी कर्मचारी ‘आयडियल’ आहेत. तरीही जलसंपदा विभागाला निवृत्त अधिकारी सेवेत घेण्याची गरज भासू लागली आहे. सेवानिवृत्त माजी सचिव एच. टी. मेंढेगिरी यांना सल्लागार म्हणून पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला खरा, परंतु मेंढेगिरींनी प्रधान सचिव दर्जाचे सल्लागार पद हवे असल्याने त्याबाबत आदेश काढायचे कसे, असा पेच निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जलसंपदा विभागांतर्गत विविध महामंडळांना सल्लागार नेमण्याचे अधिकार आहेत. त्यातून अनेक सेवानिवृत्तांची सोय लावली जात आहे. महामंडळाचे रूपांतर नदीखोऱ्यात करण्यासाठी नदीखोरे एजन्सी नेमली गेली. हे काम पूर्णत: तांत्रिक असताना त्यावर माजी प्रधान सचिव सुरेशकुमार यांची समिती नेमली गेली. शिवाय त्यांना तांत्रिक सल्ले देण्यासाठी व्ही. एम. रानडे यांना नेमले गेले. अशा नेमणुका करण्याऐवजी विभागाकडे अनेक अभ्यासू अधिकारी आहेत, पण त्यांना जबाबदाऱ्या न देता बाहेर गेलेल्यांना पुन्हा वाजतगाजत आणण्याची प्रथा या विभागात रूढ झाली आहे. मेंढेगिरी यांना सल्लागार पदी नेमण्यासाठी असाच आग्रह धरला जात आहे. मात्र मेंढेगिरी यांनी सचिवांनी आपल्यालाच रिपोर्ट करावा, अशी अट घालून अप्रत्यक्षपणे प्रधान सचिवाच्या दर्जाची मागणी केली आहे. किमान पाच वर्षांचा अनुभव असल्याशिवाय प्रधान सचिव होता येत नाही. मेंढेगिरी यांनी फक्त ७ महिने सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. मेेंढेगिरींच्या मागण्या मान्य केल्या तर विद्यमान आयएएस दर्जाचे सचिव गवई यांनाही मेंढेगिरींना रिपोर्ट करावे लागेल. त्यातून नॉन आयएएस अधिकाऱ्याला आयएएस अधिकाऱ्याने रिपोर्ट करण्याची पद्धत अस्तित्वात येईल. सल्लागार म्हणून नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीने दिलेले सल्ले मानण्याचे बंधन सरकारवर नसते. मात्र जर मेंढेगिरीचे ऐकले तर असे सल्ले मान्य करण्याची नवी पद्धती सुरू होईल. यामुळे मेंढेगिरी यांच्या नेमणुकीची फाइल रखडली आहे.मंत्री महाजन म्हणतात...मेंढेगिरी यांना सचिव दर्जाची काही जबाबदारी देण्याचे ठरले आहे, मात्र प्रधान सचिव केले जाणार नाही, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. सल्लागारांना सचिव केले व अशा व्यक्तीने काही निर्णय घेतले तर त्याचे उत्तरदायित्व कोणावर राहील, असे विचारले असता महाजन यांनी लवकरच सगळे स्पष्ट होईल, असे सांगितले आहे.