शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सल्लागारांना हवा प्रधान सचिवाचा दर्जा

By admin | Updated: September 12, 2015 02:22 IST

गेल्या १० महिन्यांपासून जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याने जवळपास ५० टक्के अधिकारी कर्मचारी ‘आयडियल’ आहेत. तरीही जलसंपदा विभागाला निवृत्त अधिकारी

- अतुल कुलकर्णी,  मुंबई गेल्या १० महिन्यांपासून जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याने जवळपास ५० टक्के अधिकारी कर्मचारी ‘आयडियल’ आहेत. तरीही जलसंपदा विभागाला निवृत्त अधिकारी सेवेत घेण्याची गरज भासू लागली आहे. सेवानिवृत्त माजी सचिव एच. टी. मेंढेगिरी यांना सल्लागार म्हणून पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला खरा, परंतु मेंढेगिरींनी प्रधान सचिव दर्जाचे सल्लागार पद हवे असल्याने त्याबाबत आदेश काढायचे कसे, असा पेच निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जलसंपदा विभागांतर्गत विविध महामंडळांना सल्लागार नेमण्याचे अधिकार आहेत. त्यातून अनेक सेवानिवृत्तांची सोय लावली जात आहे. महामंडळाचे रूपांतर नदीखोऱ्यात करण्यासाठी नदीखोरे एजन्सी नेमली गेली. हे काम पूर्णत: तांत्रिक असताना त्यावर माजी प्रधान सचिव सुरेशकुमार यांची समिती नेमली गेली. शिवाय त्यांना तांत्रिक सल्ले देण्यासाठी व्ही. एम. रानडे यांना नेमले गेले. अशा नेमणुका करण्याऐवजी विभागाकडे अनेक अभ्यासू अधिकारी आहेत, पण त्यांना जबाबदाऱ्या न देता बाहेर गेलेल्यांना पुन्हा वाजतगाजत आणण्याची प्रथा या विभागात रूढ झाली आहे. मेंढेगिरी यांना सल्लागार पदी नेमण्यासाठी असाच आग्रह धरला जात आहे. मात्र मेंढेगिरी यांनी सचिवांनी आपल्यालाच रिपोर्ट करावा, अशी अट घालून अप्रत्यक्षपणे प्रधान सचिवाच्या दर्जाची मागणी केली आहे. किमान पाच वर्षांचा अनुभव असल्याशिवाय प्रधान सचिव होता येत नाही. मेंढेगिरी यांनी फक्त ७ महिने सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. मेेंढेगिरींच्या मागण्या मान्य केल्या तर विद्यमान आयएएस दर्जाचे सचिव गवई यांनाही मेंढेगिरींना रिपोर्ट करावे लागेल. त्यातून नॉन आयएएस अधिकाऱ्याला आयएएस अधिकाऱ्याने रिपोर्ट करण्याची पद्धत अस्तित्वात येईल. सल्लागार म्हणून नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीने दिलेले सल्ले मानण्याचे बंधन सरकारवर नसते. मात्र जर मेंढेगिरीचे ऐकले तर असे सल्ले मान्य करण्याची नवी पद्धती सुरू होईल. यामुळे मेंढेगिरी यांच्या नेमणुकीची फाइल रखडली आहे.मंत्री महाजन म्हणतात...मेंढेगिरी यांना सचिव दर्जाची काही जबाबदारी देण्याचे ठरले आहे, मात्र प्रधान सचिव केले जाणार नाही, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. सल्लागारांना सचिव केले व अशा व्यक्तीने काही निर्णय घेतले तर त्याचे उत्तरदायित्व कोणावर राहील, असे विचारले असता महाजन यांनी लवकरच सगळे स्पष्ट होईल, असे सांगितले आहे.