शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १.६0 लाख हेक्टरवर चारा लागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: July 13, 2014 21:34 IST

चारा टंचाईवर उपाय, २५ कोटी खर्च करणार, शेतकर्‍यांना पंधराशे रूपये अनुदान

अकोला: पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सतत निर्माण होणार्‍या चारा टंचाईचा सामना करण्यासाठी, राज्यात चारा गतीमान विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत चालू खरीप हंगामात, राज्यातील एक लाख साठ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, चारा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना बियाणे खरेदीसाठी पंधराशे रू पयाचे अनुदान दिले जाणार आहे. गत दहा वर्षात पावसाची अनिश्‍चितता वाढली असून, राज्याला सातत्याने अवर्षनाच्या स्थितीला सामोरे जावे लागत आहे. अवर्षनामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन वर्षांपूर्वी पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चार्‍याचीही टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी विदर्भातील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला चारा मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील पशूपालक शेतकर्‍यांना पाठविला होता. दरम्यान, यावर्षीही पावसाने विलंब केला असून, राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बघून, भाविष्यातील चारा टंचाईचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने चारा गतीमान विकास कार्यक्र म हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात या कार्यक्रमातंर्गत चारा लागवड करण्यात येईल. चारा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनातर्फे बियाणे खरेदीसाठी पंधराशे रू पयाचे अनुदान दिले जाणार आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

** विविध जातींच्या गवताची शिफारस

उशीरा पेरणीसाठी रू चीरा फुले, अमृता, मालदांडी, फुले गोधन, तसेच पाण्याची उपलब्धता पाहून मका (आफ्रीकन टॉल), संकरीत नेपिअर, फुले जयंवत, किंवा मारवेल फुले गोवर्धन, या चारा पिकांची लागवड करावी, तर कुरण विकासासाठी फुले मारवेल, मद्रास, अंजन, काझरी-७५, डोगरी, प्यारा, गीनी, यशवंत, बलवंत हे गवत उपयुक्त आहे. पाऊस सुरू होताच शेतकर्‍यांनी या गवताची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.