शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राज्यात १.६0 लाख हेक्टरवर चारा लागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: July 13, 2014 21:34 IST

चारा टंचाईवर उपाय, २५ कोटी खर्च करणार, शेतकर्‍यांना पंधराशे रूपये अनुदान

अकोला: पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सतत निर्माण होणार्‍या चारा टंचाईचा सामना करण्यासाठी, राज्यात चारा गतीमान विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत चालू खरीप हंगामात, राज्यातील एक लाख साठ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, चारा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना बियाणे खरेदीसाठी पंधराशे रू पयाचे अनुदान दिले जाणार आहे. गत दहा वर्षात पावसाची अनिश्‍चितता वाढली असून, राज्याला सातत्याने अवर्षनाच्या स्थितीला सामोरे जावे लागत आहे. अवर्षनामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन वर्षांपूर्वी पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चार्‍याचीही टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी विदर्भातील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला चारा मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील पशूपालक शेतकर्‍यांना पाठविला होता. दरम्यान, यावर्षीही पावसाने विलंब केला असून, राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बघून, भाविष्यातील चारा टंचाईचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने चारा गतीमान विकास कार्यक्र म हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात या कार्यक्रमातंर्गत चारा लागवड करण्यात येईल. चारा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनातर्फे बियाणे खरेदीसाठी पंधराशे रू पयाचे अनुदान दिले जाणार आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

** विविध जातींच्या गवताची शिफारस

उशीरा पेरणीसाठी रू चीरा फुले, अमृता, मालदांडी, फुले गोधन, तसेच पाण्याची उपलब्धता पाहून मका (आफ्रीकन टॉल), संकरीत नेपिअर, फुले जयंवत, किंवा मारवेल फुले गोवर्धन, या चारा पिकांची लागवड करावी, तर कुरण विकासासाठी फुले मारवेल, मद्रास, अंजन, काझरी-७५, डोगरी, प्यारा, गीनी, यशवंत, बलवंत हे गवत उपयुक्त आहे. पाऊस सुरू होताच शेतकर्‍यांनी या गवताची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.