शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

अनुदानित शाळांतील भरती शासनामार्फत!

By admin | Updated: July 8, 2015 02:25 IST

राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे यापुढे शासनामार्फत भरण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

सुधीर लंके, पुणेराज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे यापुढे शासनामार्फत भरण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीकडे कमाईचे साधन म्हणून पाहणाऱ्या शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले आहे़ सध्या शिक्षक व प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता देण्याचा अधिकार तेवढा शासनाकडे आहे. शालेय शिक्षण विभागात जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकारी तर महाविद्यालयांबाबत विभागीय शिक्षण सहसंचालक ही मान्यता देतात. त्यापुढे भरतीवर सर्व अंकुश संस्थाचालकांचा असतो. शासनाच्या संचालक कार्यालयांनाही याबाबत काहीही पत्ता नसतो. मुलाखतींसाठीच्या समितीत शासनाचे प्रतिनिधी केवळ नावाला असतात. त्यामुळे भरतीत मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक संस्थांनी प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, महिला, अपंग या प्रवर्गांसाठीचे समांतर आरक्षणच पाळलेले नाही. या आरक्षणाची आकडेवारीही संचालक कार्यालयांकडे नसल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले आहे. या भरतीवर आमचा कुठलाही अंकुश नसून आम्ही केवळ कागदी वाघ आहोत, हे तेथील अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. बहुतांश संस्था राजकारण्यांच्याच ताब्यात असल्याने राजकीय पक्ष सोयीस्कर मौन बाळगून आहेत. मात्र, नुकतेच नागपूर खंडपीठाने सरकारला ‘अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन सार्वजनिक निधीतून दिले जाते, तर भरतीवर सरकारचा अंकुश का नाही?’ असा प्रश्न केला. त्यामुळे सरकारला न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार आहे. शालेय शिक्षण सचिवांनी या वृत्तास दुजोरा दिला. उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडेही केंद्रीय भरतीबाबत मागण्या आल्या असून, हे प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत. कुलगुरुंच्या समितीनेही ही मागणी केली आहे. ..............पदभरतीत घोटाळा इयत्ता आठवीपर्यंतची शिक्षक भरती ‘टीईटी’ परीक्षेतून करण्याचे धोरण फेब्रुवारी २०१२ मध्ये घेण्यात आले आहे. मात्र, राज्यात अनेक संस्थाचालकांनी त्यापूर्वीच्या तारखांनी मान्यता दाखवून २०१२ नंतरही ‘टीईटी’ शिवाय पदे भरल्याचे समजते. ठाणे जिल्हा परिषदेत ही उदाहरणे समोर आली आहेत. शिक्षण विभागाने याबाबत चौकशी केल्यास या भरतीचा मोठा घोटाळा समोर येईल, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. शासन ज्या संस्थांना अनुदान देते त्या संस्थांतील शिक्षकांची भरती शासनामार्फतच केंद्रीय पद्धतीने करण्याचा विचार सुरू आहे. गुणवत्ता वाढविण्याचे धोरण यामागे आहे. - नंदकुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण.