शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित शाळांतील भरती शासनामार्फत!

By admin | Updated: July 8, 2015 02:25 IST

राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे यापुढे शासनामार्फत भरण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

सुधीर लंके, पुणेराज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे यापुढे शासनामार्फत भरण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीकडे कमाईचे साधन म्हणून पाहणाऱ्या शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले आहे़ सध्या शिक्षक व प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता देण्याचा अधिकार तेवढा शासनाकडे आहे. शालेय शिक्षण विभागात जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकारी तर महाविद्यालयांबाबत विभागीय शिक्षण सहसंचालक ही मान्यता देतात. त्यापुढे भरतीवर सर्व अंकुश संस्थाचालकांचा असतो. शासनाच्या संचालक कार्यालयांनाही याबाबत काहीही पत्ता नसतो. मुलाखतींसाठीच्या समितीत शासनाचे प्रतिनिधी केवळ नावाला असतात. त्यामुळे भरतीत मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक संस्थांनी प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, महिला, अपंग या प्रवर्गांसाठीचे समांतर आरक्षणच पाळलेले नाही. या आरक्षणाची आकडेवारीही संचालक कार्यालयांकडे नसल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले आहे. या भरतीवर आमचा कुठलाही अंकुश नसून आम्ही केवळ कागदी वाघ आहोत, हे तेथील अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. बहुतांश संस्था राजकारण्यांच्याच ताब्यात असल्याने राजकीय पक्ष सोयीस्कर मौन बाळगून आहेत. मात्र, नुकतेच नागपूर खंडपीठाने सरकारला ‘अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन सार्वजनिक निधीतून दिले जाते, तर भरतीवर सरकारचा अंकुश का नाही?’ असा प्रश्न केला. त्यामुळे सरकारला न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार आहे. शालेय शिक्षण सचिवांनी या वृत्तास दुजोरा दिला. उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडेही केंद्रीय भरतीबाबत मागण्या आल्या असून, हे प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत. कुलगुरुंच्या समितीनेही ही मागणी केली आहे. ..............पदभरतीत घोटाळा इयत्ता आठवीपर्यंतची शिक्षक भरती ‘टीईटी’ परीक्षेतून करण्याचे धोरण फेब्रुवारी २०१२ मध्ये घेण्यात आले आहे. मात्र, राज्यात अनेक संस्थाचालकांनी त्यापूर्वीच्या तारखांनी मान्यता दाखवून २०१२ नंतरही ‘टीईटी’ शिवाय पदे भरल्याचे समजते. ठाणे जिल्हा परिषदेत ही उदाहरणे समोर आली आहेत. शिक्षण विभागाने याबाबत चौकशी केल्यास या भरतीचा मोठा घोटाळा समोर येईल, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. शासन ज्या संस्थांना अनुदान देते त्या संस्थांतील शिक्षकांची भरती शासनामार्फतच केंद्रीय पद्धतीने करण्याचा विचार सुरू आहे. गुणवत्ता वाढविण्याचे धोरण यामागे आहे. - नंदकुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण.