शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अँग्रो फॉरेस्ट्री, बीएस्सी फॉरेस्ट्रीचा वाद अखेर सुटला

By admin | Updated: November 25, 2015 01:58 IST

वनशास्त्र पदवीधरांना नोकरी देण्यास बँका करायच्या टाळाटाळ.

अकोला : राज्यातील वनशास्त्र महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या पदवीधरांच्या गुणपत्रिकेवर 'कृषी वनशास्त्र' (अँग्रो फॉरेस्ट्री) लिहिलेले नसल्याने राज्यातील काही बँकांनी क्षेत्र अधिकारी म्हणून त्यांना नोकरी देण्यास टाळाटाळ चालवली आहे. कृषी वनशास्त्र (अँग्रो फॉरेस्ट्री) की वनशास्त्र पदवी (बी.एस्सी. फॉरेस्ट्री) असा संभ्रम निर्माण झाल्याने या पदवीधरांचे नुकसान होत होते. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हा वाद निकाली काढला असून, या आशयाचे पत्र केंद्रीय अर्थ मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक व बँकिंग भरती मंडळाला मंगळवारी देण्यात आले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सन १९८५-८६ पासून वनशास्त्र विषयात स्नातक व स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू केला, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १९८६-८७ मध्ये हाच अभ्यासक्रम सुरू केला होता. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता पूर्वी २0 होती. या शाखेकडे वाढत असलेला विद्यार्थ्यांचा कल बघता, २00७ मध्ये या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ३२ करण्यात आली. मागील तीन दशकात वनशास्त्र विषयाची पदवी घेऊन शेकडो विद्यार्थी बाहेर पडले असून, त्यापैकी बहुतांश राज्य लोकसेवा आयोगामार्फत अनेक विभागांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँकांच्या कृषी शाखेत प्रक्षेत्र अधिकारी म्हणून नोकरी मिळावी, यासाठी या शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू केले; परंतु बँकांनी वनशास्त्र पदवीपुढे 'कृषी' शब्द नसल्याने त्यांना नोकरी देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा दरवाजा ठोठावला असून, देशात कुठेच 'अँग्रो फॉरेस्ट्री' अभ्यासक्रम नसून 'बी.एस्सी. फॉरेस्ट्री' असल्याने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी यासंदर्भात संबधित विभागाला पत्र देऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते.

*कृषी मंत्रालयाच्या पत्राने वाद निकाली

        कृषी वनशास्त्र व वनशास्त्र पदवी हा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला कळवले होते आणि विद्यार्थ्यांही पाठपुरावा केल्याने हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे कृषी विद्या पीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले यांनी सांगीतले.