शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांना मिळणार आता अखंड वीज

By admin | Updated: September 7, 2016 05:23 IST

पुढील सलग तीन महिने राज्यातील ३८ लाख कृषी पंपांना पहाटे ५.३० ते सायंकाळी असा १२ तास अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढील सलग तीन महिने राज्यातील ३८ लाख कृषी पंपांना पहाटे ५.३० ते सायंकाळी असा १२ तास अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत आठच तास वीजपुरवठा करण्यात येत होता आणि तोदेखील बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी. या निर्णयाने शेतकऱ्यांना जादा काळ आणि तेही दिवसा वीज मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने येथील पिकांना पाण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महावितरणला दिले. काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेत पाणी असूनही वीजेअभावी ते शेतीला देता येत नाही. त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास, पिकांना फायदा होईल. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठऐवजी १२ तास वीजपुरवठा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, वीजपंपांना १२ तास वीज दिल्याने सबसिडीचा सुमारे ५०० कोटींचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)वीजचोरीबाबत सध्या राज्यात सहा सर्कलमधील पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून घेतली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई करताना वेळेचा अपव्यव होतो. ते रोखण्यासाठी आणि वीज चोरीला प्रतिबंध घातला यावा यासाठी आता सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन किंवा तीन पोलीस ठाणे प्राधिकृत करु न तेथे वीजचोरीची तक्र ार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी रोखण्यासाठी वीज महामंडळामार्फत भरारी पथकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करु न वीजचोरी रोखावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. याशिवाय, एका अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वात पथकही स्थापन करण्यात येईल.सौर ऊर्जेसाठी फिडरसौर ऊर्जापुरवठ्यासाठी आता स्वतंत्र फिडर उभारण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात लवकरच करण्यात येईल. या तालुक्यातील कर्जुले पठार व निमोण उपकेंद्र येथे प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील काळात सौर ऊर्जेच्या अधिक वापरावर भर दिला जाईल.