शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कृषी समृद्धी ८५ गावांत

By admin | Updated: June 7, 2017 03:57 IST

शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले

अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले असून ते तालुका कृषी विभागातर्फे १ मे ते १५ मे आणि २४ मे ते ८ जून अशा दोन टप्यात राबविले जाणार आहे. डहाणू तालुक्यातील खरीप हंगामाचे भात क्षेत्र १५ हजार हेक्टर असून हळवे २५४५ हे., निमगरवे ९९०६ हे. आणि गरवे २५४० हे. इतके आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी असून डोंगरी आणि सागरी भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. डहाणू पंचायत समिती कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या हळव्या भाताच्या बियाणाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकारी ए. बी. जैन यांनी दिली.या योजनेचा फायदा ८५ ग्रामपंचायतीतील १७४ गावांमधील प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट आहे. डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळाचे अधिकारी, ६ सुपरवायझर व २८ कृषी सहाय्यकांच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केल्याची माहिती कृषी अधिकारी आर. यू. ईभाड यांनी दिली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भाताची अनुवांशिक उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन वाढविणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करणे आणि शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन यंत्राचा जास्तीत-जास्त अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे या स्वरूपात ही योजना राबविली जाईल. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, या करिता विशेष मोहीम राबवली जाणे आवश्यक असून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत तालुक्यात भरारी पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. >भाताच्या गुजरात वाणाला महाराष्ट्रात बंदी का ?शासनाच्या कृषी विभागामार्फत केवळ एकाच जातीचे भात बियाणे पुरविले जात आहे. येथील जमितीन गुजरात या भात वाणापासून दर्जेदार पीक मिळत असून सरासरी उत्पादन चांगले येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुजरात ४ (हळवे) आणि ११ (गरवे) दोन प्रकारात ते उपलब्ध असून कोलम या भाताशी साम्य आहे. त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या वाणाला महाराष्ट्रात विक्रीकरिता बंदी आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी गुजरातमध्ये जावे लागत आहे. शासनाकडून लादलेल्या बंदीचे कारण अद्याप समजलेले नाही तथापि शेतकऱ्यांच्या हिताकरिता ही बंदी तत्काळ हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी उत्पादन वाढविणे हा त्या मागचा उद्देश आहे.- आर. यू. इभाड, तालुका कृषी अधिकारी, डहाणूया विभागात भाताच्या खरीप हंगामासाठी १५० क्विंटल भात वाणांचा पुरवठा झाला आहे. ७/१२ च्या उताऱ्याची प्रत जमा करून १० किलोसाठी १७० रु पये आकारणी केली जाते. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- ए. बी. जैन, कृषी अधिकारी, डहाणू पंचायत समिती