शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कृषी समृद्धी ८५ गावांत

By admin | Updated: June 7, 2017 03:57 IST

शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले

अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले असून ते तालुका कृषी विभागातर्फे १ मे ते १५ मे आणि २४ मे ते ८ जून अशा दोन टप्यात राबविले जाणार आहे. डहाणू तालुक्यातील खरीप हंगामाचे भात क्षेत्र १५ हजार हेक्टर असून हळवे २५४५ हे., निमगरवे ९९०६ हे. आणि गरवे २५४० हे. इतके आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी असून डोंगरी आणि सागरी भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. डहाणू पंचायत समिती कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या हळव्या भाताच्या बियाणाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकारी ए. बी. जैन यांनी दिली.या योजनेचा फायदा ८५ ग्रामपंचायतीतील १७४ गावांमधील प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट आहे. डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळाचे अधिकारी, ६ सुपरवायझर व २८ कृषी सहाय्यकांच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केल्याची माहिती कृषी अधिकारी आर. यू. ईभाड यांनी दिली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भाताची अनुवांशिक उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन वाढविणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करणे आणि शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन यंत्राचा जास्तीत-जास्त अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे या स्वरूपात ही योजना राबविली जाईल. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, या करिता विशेष मोहीम राबवली जाणे आवश्यक असून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत तालुक्यात भरारी पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. >भाताच्या गुजरात वाणाला महाराष्ट्रात बंदी का ?शासनाच्या कृषी विभागामार्फत केवळ एकाच जातीचे भात बियाणे पुरविले जात आहे. येथील जमितीन गुजरात या भात वाणापासून दर्जेदार पीक मिळत असून सरासरी उत्पादन चांगले येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुजरात ४ (हळवे) आणि ११ (गरवे) दोन प्रकारात ते उपलब्ध असून कोलम या भाताशी साम्य आहे. त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या वाणाला महाराष्ट्रात विक्रीकरिता बंदी आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी गुजरातमध्ये जावे लागत आहे. शासनाकडून लादलेल्या बंदीचे कारण अद्याप समजलेले नाही तथापि शेतकऱ्यांच्या हिताकरिता ही बंदी तत्काळ हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी उत्पादन वाढविणे हा त्या मागचा उद्देश आहे.- आर. यू. इभाड, तालुका कृषी अधिकारी, डहाणूया विभागात भाताच्या खरीप हंगामासाठी १५० क्विंटल भात वाणांचा पुरवठा झाला आहे. ७/१२ च्या उताऱ्याची प्रत जमा करून १० किलोसाठी १७० रु पये आकारणी केली जाते. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- ए. बी. जैन, कृषी अधिकारी, डहाणू पंचायत समिती