शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

खेड्यातच कृषी उद्योजक तयार व्हावेत- कुलगुरू

By admin | Updated: February 25, 2017 02:21 IST

राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप; देशातील २५0 शास्त्रज्ञांची उपस्थिती

अकोला, दि. २४- ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत बदल घडवून आणायचे असतील, तर खेड्यातच उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. याकरिता कृषी प्रक्रियेवर आधारित 'उद्योजकता विकास' या विषयावर परिसंवाद घेणेदेखील काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्यावतीने २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवसीय ह्यशाश्‍वत जीवन शैलीह्ण कृषी प्रक्रियेवर आधारित ह्यउद्योजकता विकासह्ण या विषयावर कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी डॉ. दाणी बोलत होते. व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. बी.जी. बथकल, कृषी विभागाचे सहसचालक डॉ.एस.आर. सरदार, संशोधन संचालक डॉ.डी.एम. मानकर, विस्तार संचालक डॉ.पी.जी. इंगोले, अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, कापणीपश्‍चात संशोधन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांची उपस्थिती होती.डॉ. दाणी पुढे बोलताना म्हणाले, कृषी शेतमाल प्रक्रियेवर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गावागावांत उद्योजक निर्माण केले आहेत. या उद्योजक शेतकर्‍यांचा येथे सन्मान होणे हेच देशातील शेतकर्‍यांसमोर प्रेरणादायी ठरणारे आहे. हे शेतकरी खरे रोल मॉडेल ठरतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बथकल यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात भारत खूप पिछाडीवर असल्याचे सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करायची असेल, तर ग्रामीण भागातच प्रक्रिया उद्योग व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी आता हे अपरिहार्य असल्याचे ते म्हणाले. डॉ. इंगोले, डॉ. मानकर, डॉ. नागदेवे यांनी या संदर्भात विचार मांडले.परिसंवादाला देशातील या विषयातील २५0 पेक्षा अधिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकर्‍यांची उपस्थिती होती. या परिसंवादात ४३५ संशोधन पेपर्सचे वाचन करण्यात आले. येथे पोस्टर्स प्रदर्शन लावण्यात आले होते. २४ जणांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल कांबळे यांनी, तर आभार डॉ. प्रदीप बोरकर यांनी मानले.कृषी विद्यापीठाने केले उद्योजक तयार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रक्रिया यंत्र तयार केले असून, हे यंत्र शेतकरी व महिला बचत गटांना गावागावांत देण्यात आले आहेत. यासाठीचे तंत्रज्ञान त्यांना कृषी विद्यापीठाने पुरविले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुढाकाराने परिसंवाद व प्रक्रिया उद्योगाचे जाळे विदर्भात विणले जात आहे.