शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी पेणचा कृषी विभाग सज्ज

By admin | Updated: May 20, 2014 01:02 IST

मान्सूनच्या हालचाली सुुरु झाल्याने पेणच्या खरीप हंगामासाठी पेणच्या कृषी विभागाची पूर्ण तयारीनिशी सज्जता

पेण : मान्सूनच्या हालचाली सुुरु झाल्याने पेणच्या खरीप हंगामासाठी पेणच्या कृषी विभागाची पूर्ण तयारीनिशी सज्जता झाल्याचे पेण तालुका कृषी अधिकारी वसंत मोरे व पेण पं. स. कृषी अधिकारी एन. एन. भालेराव यांनी सांगितले. यावर्षीच्या खरीप हंगामाची तयारी म्हणून ४००० क्विंटन बियाणे तर ५००० मेट्रीक टन खतांची मागणी असून शेतकर्‍यांच्या मागणीनुसार थेट बांधावर खते मागणीनुसार पोहचविली जातील असे कृषी विभागाने हंगामाच्या तयारीचे योग्य नियोजन केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या वर्षीचा मान्सून वेळेतच दाखल होत असून या खरीपात शेतकरी बांधवांना भात बियाणांचा साठा वेळेतच आलेला आहे. पेणच्या खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये २००० क्विंटल बियाणांची आवक झाली आहे. पांडापूर गोडावून ३०० क्विंटल तर पेण शहरातील व ग्रामीण परिसरातील भात बियाणे विक्रेत्यांकडेही भातबियाणांची आवक झालेली आहे. यावर्षी हवामानशास्त्र खात्याच्या हवामान अंदाजानुसार ९५ टक्के मान्सूनचे भविष्य वर्तविले आहे. मान्सूनचा प्रवास अंदमान निकोबारच्या बंगाल उपसागरातून केरळ राज्याच्या दिशेने मान्सून वाटचाल करत असल्याने शेतकर्‍यांना पावसा अगोदरच्या धूळपेरण्या करण्याची लगबग सुरु झाली आहे. २५ मे रोजी सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश होत असल्याने एकदा का रोहिणी नक्षत्र सुरु होताक्षणी शेतकरी धूळपेरण्या करण्यास प्रारंभ करतो. २५ मे ते ५ जून या दहा दिवसात या पेरण्यांचा शेड्यूल राहणार असल्याने येत्या पंधरा ते वीस दिवस भातबियाणे खरेदी - विक्री केंद्रावर शेतकरीबांधव बियाणांची खरेदी करण्यावर भर देणार आहे. शेतकर्‍यांची खरीप हंगामाची बेगमी म्हणून कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले असून ४००० क्विंटल भात बियाणामध्ये संकरित अशा भाताच्या वाणांचे बीज विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. शेतकर्‍यांना पावसाअगोदर खतांची उपलब्धता व्हावी म्हणून ५००० मेट्रीक टन खतांची मागणीही केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे शेतांच्या बांधावर थेट खत पोहचविले जाणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी फिल्डवरच्या कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे मागणी केल्यास गावच्या शेतकर्‍यांच्या ग्रुपनुसार जेवढी मागणी असेल तेवढी खते अगदी घरपोहच अथवा शेतांच्या बांधावर खत पोहचविण्याची व्यवस्था कृषी विभागाने केलेली आहे. गुणवत्ता नियंत्रक व निरीक्षक अथवा भरारी पथकांची व्यवस्था व नेमणूक करण्यात आलेली असून याद्वारे बियाणे विक्री केंद्रावर भरारी पथकाची करडी नजर असणार आहे. (वार्ताहर)