शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शेती महामंडळ कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: June 5, 2017 01:06 IST

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील १४ मळ्याची स्थापना सन १९६३ साली करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील १४ मळ्याची स्थापना सन १९६३ साली करण्यात आली होते. गेल्या तीन पिढ्यांपासून या शेतीमहामंडळाच्या मातीला नाळ जोडलेल्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबाला उपाशीपोटी जीवन जगण्याची वेळ आलेली आहे. या कामगारांना न्याय न दिल्यास सर्वच सात जिल्ह्यांतील १४ मळ्यातील हजारो कामगार मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती वालचंदनगर रत्नपुरी मळ्यातील मागासवर्गीय कामगारांनी दिले आहे.शेती महामंडळ कामगारांचे सन १९८५ ते ८६ सालापासून ८१ कोटी देणे दिले नसल्यामुळे कामगारांची कुटुंबे उद्ध्वस्त झालेले आहेत. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय लागूनही शेतीमहामंडळाने कामगारांना वाऱ्यावर सोडल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. राहते घर पाच एकर जमीन व ८१ कोटी देणे देण्यात यावे अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सात जिल्ह्यांतील हजारो कामगांनी दिला आहे. राज्यातील पुणे, सोलापूर ,कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील १४ मळ्यात सन १९६३ सालापासून हजारो मागासवर्गीय कामगार तीन पिढ्यांपासून राबत आहेत खपत असूनही या कामगारांना स्वत:चे राहते घर, जमीन नाही. त्या हजारो कुटुंबांना निराधारपणाचे जीवन जगण्याची वेळ आलेली आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे फरक देण्यात आले; परंतु कामगारांना मात्र कोणतेही फरक दिले नसल्याने आजही हे कामगार फरक मिळण्याच्या अपेक्षेने अनेक पुढाऱ्यांपुढे लोटांगण घालताना दिसतात. औरंगाबाद खंडपीठाचा कामगारांच्या बाजूने निर्णय लागूनही शेती महामंडळाने बगल दिली आहे.राज्यातील शेती महामंडळातील वालचंदनगर रत्नपुरी, शिवपुरी, सदाशिवनगर, श्रीपूर, कोल्हापूर , साखरवाडी, अहमदनगर, बेलवंडी, चांगदेवनगर, हारेगाव, श्रीरामपूर, लक्ष्मीवाडी, टिळकनगर गंगापूर, रावळगाव या १४ मळ्यातील कायम व कॅज्युअल कामगारांचे सन १९८५ पासूनचे देणे शेती महामंडळाकडे राहिले आहेत. सन २००७ साली महामंडळ बंद करण्याचा निर्णय शेतीमहामंडळाने घेतल्याने हजारो मागासवर्गीय कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने धोकादायक झालेल्या घरातच जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे.