शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे संशोधन पुरेशा मनुष्यबळाअभावी प्रभावित!

By admin | Updated: September 8, 2014 01:08 IST

केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती निवड मंडळाचे माजी अध्यक्ष सी.डी. मायी यांचे मत

अकोला : राज्यातील एकाच कृषी विद्यापिठातील सतराशेपेक्षा जास्त पदं रिक्त असतील, तर विद्यापिठाचा गाडा चालेल तरी कसा? याचाच अर्थ कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या महत्वाच्या विषयांकडे राज्य शासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी विद्यापिठाचे संशोधन प्रभावित होत असल्याचा आरोप केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना केला. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. मायी ५ स प्टेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आले असता, त्यांनी कृषीशी संबंधित अनेक विषयावर ह्यलोकमतह्णशी बातचित केली.

प्रश्न - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील सतराशे जागा रिक्त असण्याचे कारण काय ?उत्तर - खरे तर याबाबतीत राज्य शासनाने अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पदे रिक्त असणे म्हणजे, कृषी विद्यापिठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर हा मोठा आघात आहे. राज्य शासनाने काही समित्यांवर मला घेतले आहे; पण त्यातून काही साध्य होत नसल्याने या समित्याकडे फारसे लक्ष देणे मी टाळले आहे.

प्रश्न- अपुर्‍या मनुष्यबळाचे नेमके परिणाम कोणते ?उत्तर - पुरेशा मनुष्यबळाअभावी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, नवे वाण, तंत्रज्ञान, संशोधन मागे पडले आहे. चांगले शिक्षण हवे असेल तर त्यासाठी चांगले शिक्षक नको का? परंतु विद्यापिठात ही प्रक्रियाच ठप्प पडली आहे.

प्रश्न - नवीन जागा भरण्यासंदर्भात काही उपाययोजना सुरू आहेत का ?उत्तर - खरे तर उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने अलिकडेच कृषिशास्त्रज्ञ भरती निवड मंडळ स्थापन केले; पण अद्याप हे मंडळ कार्यरत झाले नसल्याने कृषी शास्त्रज्ञांची भरती प्रक्रिया अधांतरी लटकली आहे.

प्रश्न- संशोधनावर कोणते परिणाम होत आहेत ?उत्तर - पुरेसे मनुष्यबळ नसल्याने संशोधनावर दूरगामी परिणाम होत आहेत. विदर्भासारख्या मागासलेल्या भागातील उत्पादनाचे प्रमाण बघितल्यास सर्वच पिकांच्या बाबतीत आपण पिछाडीवर आहोत, हे स्पष्ट होते. अशा प्रकारे संशोधनाचा परिणाम थेट शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर झाला आहे. नवे वाण, नवे तंत्रज्ञान विकसित करण्यावर र्मयादा आल्या आहेत. अल्प मनुष्यबळात विस्तार कामही शास्त्रज्ञांनाचा करावे लागत असल्याने सर्व कामेच ठप्प पडल्यासारखी झाली आहेत. विशेष म्हणजे या राज्यात १४0 पेक्षा जास्त कृषी महाविद्यालयांच्या परीक्षा व इतर अनेक प्रकारची जबाबदारी कृषी विद्यापिठाच्या प्राध्यापकांवर आहे. यातूनच या प्राध्यापक, शास्त्रज्ञांना उसंत मिळत नाही.

प्रश्न - विदर्भातील उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी काय करावे लागेल ?उत्तर - कृषी विद्यापिठांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे वाण, तंत्रज्ञान विकसित करावे लागणार असून, उत्पादन, प्रक्रिया व मालाची विक्री अशी साखळी निर्माण करणे गरजेचे आहे. चांगले उत्पादन देणार्‍या पिकासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे; अर्थात पीक बदल करणे अपेक्षित आहे. त्यासाठी फलोत्पादन विकासातून डाळिंब व इतर फळे उत्पादक गट उभारणे आवश्यक आहे; पण पुरेसे मनुष्यबळच नसल्याने, हे सर्व करणार तरी कोण, हा खरा प्रश्न आहे. डॉ.पंदेकृविचा विकास व इतर कामे करण्यासाठी तातडीची १00 कोटींची गरज आहे.

प्रश्न - आपण याबाबतीत काही पाऊलं उचलली का ?उत्तर - मी अध्यक्ष असताना अनेक कामे मार्गी लावली. आता मी माझ्या परीने प्रयत्नशील आहे. शेवटी जे करायचे आहे, ते राज्य शासनालाच करावे लागेल.