शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

कृषी विद्यापीठांची नोकर भरती लवकरच!

By admin | Updated: November 12, 2014 23:33 IST

निवड समिती अध्यक्षाच्या निवडीकडे विद्यापीठांचे लक्ष.

अकोला: कृषी विद्यापीठांची रखडलेली नोकर भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, येत्या दोन आठवड्यात त्या संदर्भात आदेश निघणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नोकर भरती निवड समितीच्या अध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे कृषी विद्यापीठांचे लक्ष लागले आहे.गत वर्षी तत्कालीन राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळ स्थापन केले होते; तथापि ते कार्यरत न झाल्याने, कृषी विद्यापीठांची नोकर भरती प्रक्रिया रखडली आहे. याआधीही कृषी विद्यापीठ स्तरावर राबविण्यात येणार्‍या नोकर भरतीमध्ये अनेक अथडळे आले आहेत. या नोकर भरतीबाबतची काही प्रकरणे न्यायालयात गेल्याने मुख्यत्वे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची नोकर भरती झाली नाही. परिणामी या कृषी विद्यापीठात तब्बल १,७५0 शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांचा अनुशेष आहे. त्यामुळे कृषी संशोधनावर परिणाम होत असून, मनुष्यबळाअभावी या कृषी विद्यापीठाची कृषी विज्ञान केंद्रे ओस पडली आहेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, परभणी येथील स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ, या राज्यातील चार कृषी विद्यापीठांद्वारे महत्वाचे कृषी संशोधन केले जाते; तथापि अलिकडच्या दहा वर्षांत नोकर भरतीच झाली नसल्याने कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ व कर्मचार्‍यांचा अनुशेष प्रचंड वाढला आहे. दरम्यान, या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून, येत्या दोन आठवड्यात नोकरभरतीचे आदेश निघणार असल्याचे वृत्त आहे. यासाठीची तयारी कृषी विद्यपीठाने सुरू केली असून, शासनाच्या आदेशाकडे कृषी विद्यापीठाचे लक्ष लागले आहे.येत्या दोन आठवड्यात नोकर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, तसे आदेश लवकरच शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. एम भाले यांनी सांगीतले. *नोकर भरती मंडळाकडून, की कृषी विद्यापीठाकडून?कृषी विद्यापीठाची नोकर भरती प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत असले तरी, पदे भरणार कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. भरती कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळामार्फत होणार, की कृषी विद्यापीठांकडून, याबाबत अद्याप स्पष्ट संकेत प्राप्त झाले नसले तरी, हे अधिकार विद्यापीठांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.*कुलगुरू च राहील अध्यक्ष ?सहयोगी प्राध्यापक पदापर्यंतचे नोकर भरतीचे अधिकार कृषी विद्यापीठांना मिळाल्यास, या निवड समितीच्या अध्यपदी कुलगुरूचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.