शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

स्मार्ट सिटी योजनेसाठी कोरियन कंपनीशी करार

By admin | Updated: April 7, 2017 03:30 IST

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी गुरुवारी सामंजस्य करार केला

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी गुरुवारी सामंजस्य करार केला. ही कंपनी महापालिकेस स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता तांत्रिक व आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. कोरिया सरकार चार हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. यामुळे प्रकल्प अधिक गतीमान होईल, असा दावा करण्यात आला. यावेळी कंपनीचे पदाधिकारी कॅन कून फाँग, हु से चँग, पार्थ ज्यून सिमो, सॉन्ग जी सॉन्ग यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, सभागृह नेते राजेश मोरे, विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजप गटनेते वरुण पाटील यांच्यासह शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी व कोरियन कंपनीचे सल्लागार विवेक विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारने कोरियन कंपनीशी केलेल्या करारानुसार महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली शहरांचा विकास ही कंपनी करणार आहे. या शहरांत विकासाला वाव असल्याने त्यांची निवड केल्याचे कंपनीने स्पष्ट केले. एरिया बेस व पॅन सिटी या दोन मार्गाने शहरांचा विकास केला जाणार आहे. एकूण २८ प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. दरवर्षी २०० कोटी रुपये खर्चाची विकास कामे अपेक्षित असून त्यासाठी महापालिका दरवर्षी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करणार आहे. कोरियन कंपनी प्रकल्पांचे मास्टर प्लॅन तयार करणार आहे. चार हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कंपनी कमी व्याजदराने उपलब्ध करील व त्याची परतफेड कशी करायची याचे मार्गदर्शन सरकार करील, असे आयुक्त रवींद्रन यांनी स्पष्ट केले. महापौर देवळेकर म्हणाले की, या करारामुळे शहरे स्मार्ट करण्याच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल आहे. कंपनीचे सल्लागार विवेक विचारे यांनी सांगितले की, करार करण्यात आलेली कंपनी ही सरकारी असून तिची स्थापना १९५२ मध्ये झाली. या कंपनीने कोरियातील ५० शहरे स्मार्ट केली आहेत. कंपनीकडे जवळपास ९ हजारांचे मनुष्यबळ आहे. (प्रतिनिधी)>व्हिडीओ चित्रफितीत मांडला आराखडाकंपनीने सादर केलेल्या व्हिडीओ चित्रफितीमध्ये स्मार्ट सिटीचा विकास कसा केला जाणार, याचा आराखडा दाखवण्यात आला. खाडी किनारा सुशोभिकरण, रेल्वे परिसर वाहतूककोंडी मुक्त करणे, वाहतुकीचे नियोजन, रस्ते विकास यावर भर देण्यात आला आहे. आयटी कंपन्या, ग्रीन लॅण्डचा विकास करुन त्याद्वारे शहरात नोकऱ्या उपलब्ध होतील. कल्याण-डोंबिवली शहरे २०१७ ते २०२३ या कालावधीत स्मार्ट करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी २ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.