शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट

By admin | Updated: March 5, 2015 01:42 IST

राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट अद्याप सरले नसून शनिवारपासून पुन्हा तो बरसण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट अद्याप सरले नसून शनिवारपासून पुन्हा तो बरसण्याची शक्यता आहे. तसेच रविवारी व सोमवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्याला भरलेली हुडहुडी बुधवारीही कामय होती. अनेक शहरांचे कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खालीच होते.देशावर निर्माण झालेली हवेची द्रोणीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातील हवेचा कमी दाबाचा पट्टा पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात वाहू लागतील; त्यामुळे शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसास सुरूवात होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यभरात पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी दिली.गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. बुधवारी दिवसभरात राज्यात कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या तापमानात झालेली घट बुधवारी देखील कायम होती.मध्य महाराष्ट्र, कोकण या शहरांचे कमाल तापमान ३० अंशाच्या खाली होते. तर विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान ३२ अंशाच्या आत होते. नाशिकचे कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल ७.१ अंशांनी घटून २६.५ अंशापर्यंत खाली आले होते. पुणे, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, मालेगाव, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशापर्यंत कमी झाले होते.यवतमाळचे किमान तापमान सरारीपेक्षा तब्बल ७.८ अंशांनी घटून ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा, मुंबई, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती या शहरांच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली. महाबळेश्वरात दवबिंदू गोठलेमहाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये थंडीच्या कडाक्यामुळे वेण्णा लेक परिसर ते लिंगमळापर्यंतच्या भागात दवबिंदू गोठल्यामुळे प्रचंड प्रमाणात हिमकण पाहावयास मिळाले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार शहरातील किमान तापमान आठ अंश सेल्सिअस होते. गेल्या चार वर्षांतील शहराचे हे सर्वांत कमी तापमान म्हणून याची नोंद झाली आहे. अवेळी पडलेल्या अशा थंडीच्या कडाक्यामुळे स्ट्रॉबेरीसारख्या नाजूक फळांचे काही प्रमाणात नुकसान झाले.