शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

अंबानींविरुद्ध याचिका फेटाळली

By admin | Updated: July 27, 2016 02:41 IST

रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या आलिशान निवासी इमारतीच्या विरोधात केली गेलेली जनहित याचिका, हा न्यायालयाच्या वेळेचा

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या आलिशान निवासी इमारतीच्या विरोधात केली गेलेली जनहित याचिका, हा न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय करण्यासाठी केलेला थिल्लरपणा आहे, असे नमूद करत, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका मंगळवारी फेटाळली.न्या. विद्यासागर कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने याचिका केवळ फेटाळलीच नाही, तर ती करणारे यचिकाकर्ते शादाब पटेल यांना ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला, तसेच या याचिकेचे समर्र्थन करून सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करणारे वकील फिरोज अन्सारी यांनी दाव्याच्या खर्चापोटी २५ हजार रुपये द्यावेत, असेही निर्देश खंडपीठाने दिले. सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा करून शादाब अन्सारी यांनी ही याचिका केली होती, परंतु त्यांची खरडपट्टी काढताना न्यायालयाने म्हटले की, जमिनीच्या विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर १४ वर्षांनी तुम्ही ही याचिका का केली? तुम्ही खरेच सामाजिक कार्यकर्ते असाल व याचिका करण्यामागचा तुमचा हेतू साफ असता, तर तुम्ही एवढ्या उशिरा न्यायालयात आला नसता. तुम्ही न्यायालयाच्या वेळेचा निव्वळ अपव्यय करीत आहात. अशा थिल्लर याचिका करणाऱ्यांना जबर भूर्दंड दिल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, असेही न्या. कानडे यांनी नमूद केले. ‘अँटिलिया’ उभी असलेली जमीन वक्फ बोर्डाची आहे व ती कवडीमोल किमतीने बेकायदेशीरपणे अंबानी यांना विकण्यात आली, असा आरोप करून याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, ही जमीन मुळात करीमभॉय इब्राहिम खोजा अनाथालयाची होती. बाजारभावाप्रमाणे सुमारे २०० कोटी रुपये किंमत असलेली ही जमीन त्याच्या अवघ्या १० टक्के भावाने, म्हणजे २१ कोटी रुपयांना अंबानी यांना विकण्यात आली. जमिनीचा हा कथित व्यवहार झाल्यावर, इतकी वर्षे तुम्ही झोपला होतात का, असे न्यायालयाने विचारल्यावर, याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. खान जावेद अख्तर यांनी असे सांगितले की, ‘सरकारने यासंबंधी एक चौकशी आयोग नेमला होता. त्या आयोगाचा अहवाल काही वर्षांपूर्वीच आला.’ पण १४ वर्षांच्या विलंबासाठी दिलेली ही लंगडी सबब न्यायालयाच्या पचनी पडली नाही. (विशेष प्रतिनिधी)दंडाची रक्कम कर्करुग्णांसाठीसुरुवातीस न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यास पाच लाख रुपयांचा दंड करण्याचा मानस बोलून दाखविला होता, परंतु प्रत्यक्ष निकाल देताना त्यांनी ही रक्कम ५० हजार रुपये केली. दंडाची रक्कम एखाद्या धर्मादाय संस्थेला देण्याची विनंती अंबानी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांनी केली. त्यानुसार, शादाब यांनी दंडाची व अन्सारी यांनी दाव्याच्या खर्चाची रक्कम कर्करुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल इस्पितळास देण्याचे निर्देश दिले.