शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अंबानींविरुद्ध याचिका फेटाळली

By admin | Updated: July 27, 2016 02:41 IST

रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या आलिशान निवासी इमारतीच्या विरोधात केली गेलेली जनहित याचिका, हा न्यायालयाच्या वेळेचा

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या आलिशान निवासी इमारतीच्या विरोधात केली गेलेली जनहित याचिका, हा न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय करण्यासाठी केलेला थिल्लरपणा आहे, असे नमूद करत, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका मंगळवारी फेटाळली.न्या. विद्यासागर कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने याचिका केवळ फेटाळलीच नाही, तर ती करणारे यचिकाकर्ते शादाब पटेल यांना ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला, तसेच या याचिकेचे समर्र्थन करून सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करणारे वकील फिरोज अन्सारी यांनी दाव्याच्या खर्चापोटी २५ हजार रुपये द्यावेत, असेही निर्देश खंडपीठाने दिले. सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा करून शादाब अन्सारी यांनी ही याचिका केली होती, परंतु त्यांची खरडपट्टी काढताना न्यायालयाने म्हटले की, जमिनीच्या विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर १४ वर्षांनी तुम्ही ही याचिका का केली? तुम्ही खरेच सामाजिक कार्यकर्ते असाल व याचिका करण्यामागचा तुमचा हेतू साफ असता, तर तुम्ही एवढ्या उशिरा न्यायालयात आला नसता. तुम्ही न्यायालयाच्या वेळेचा निव्वळ अपव्यय करीत आहात. अशा थिल्लर याचिका करणाऱ्यांना जबर भूर्दंड दिल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, असेही न्या. कानडे यांनी नमूद केले. ‘अँटिलिया’ उभी असलेली जमीन वक्फ बोर्डाची आहे व ती कवडीमोल किमतीने बेकायदेशीरपणे अंबानी यांना विकण्यात आली, असा आरोप करून याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, ही जमीन मुळात करीमभॉय इब्राहिम खोजा अनाथालयाची होती. बाजारभावाप्रमाणे सुमारे २०० कोटी रुपये किंमत असलेली ही जमीन त्याच्या अवघ्या १० टक्के भावाने, म्हणजे २१ कोटी रुपयांना अंबानी यांना विकण्यात आली. जमिनीचा हा कथित व्यवहार झाल्यावर, इतकी वर्षे तुम्ही झोपला होतात का, असे न्यायालयाने विचारल्यावर, याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. खान जावेद अख्तर यांनी असे सांगितले की, ‘सरकारने यासंबंधी एक चौकशी आयोग नेमला होता. त्या आयोगाचा अहवाल काही वर्षांपूर्वीच आला.’ पण १४ वर्षांच्या विलंबासाठी दिलेली ही लंगडी सबब न्यायालयाच्या पचनी पडली नाही. (विशेष प्रतिनिधी)दंडाची रक्कम कर्करुग्णांसाठीसुरुवातीस न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यास पाच लाख रुपयांचा दंड करण्याचा मानस बोलून दाखविला होता, परंतु प्रत्यक्ष निकाल देताना त्यांनी ही रक्कम ५० हजार रुपये केली. दंडाची रक्कम एखाद्या धर्मादाय संस्थेला देण्याची विनंती अंबानी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांनी केली. त्यानुसार, शादाब यांनी दंडाची व अन्सारी यांनी दाव्याच्या खर्चाची रक्कम कर्करुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल इस्पितळास देण्याचे निर्देश दिले.