शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

उपऱ्यांमुळे झाला शिवसेनेचा विचका

By admin | Updated: April 24, 2015 01:41 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही

नारायण जाधव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या सत्त्वपरीक्षेत गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. योग्य राजकीय डावपेच, शिवसेनेत उफाळून आलेली बंडखोरी याचा अचूक लाभ घेत त्यांनी १११पैकी ५२ जागा जिंकल्या आणि आपणच नवी मुंबईचे ‘दादा’ आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. शिवसेनेला ३८, भाजपाला ६, काँगे्रसला १० आणि अपक्षांना ५ जागा मिळाल्या असल्या तरी त्यात २ राष्ट्रवादी पुरस्कृत आणि २ बंडखोर असल्याने महापालिकेची सत्ता राखण्यासाठी आवश्यक असलेली ५६ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे नाईक यांना अवघड नाही. त्यातही त्यांनी काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. उपऱ्या नेत्यांकडे पक्षाची सूत्रे सोपविल्याने पोषक वातावरण असतानाही शिवसेनेला सत्तेचा सोपान चढणे कठीण गेले.महापालिकेतील घराणेशाहीमुळे गणेश नाईक यांच्याविरोधात नवी मुंबईत प्रचंड असंतोष होता. त्यातच विधानसभेतील पराभवामुळे नाईकांच्या गोटात नैराश्याचे वातावरण पसरले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी समर्थकांनी त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जाण्याचा आग्रह धरला. त्यावर नाईक यांनी मौन बाळगल्याने श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज तर झालेच; मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर पाटकर, शिवराम पाटील, अनिता पाटील, नारायण पाटील, एम. के. मढवी, विनया मढवी, मधुकर मुकादम यांनी शिवसेनेत तर कविता जाधव यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यासाठी सेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, आयारामांना पक्षात प्रवेश देताना नाहटा यांनी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंसह एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात घेतले नाही. युतीची बोलणी करायला आणि जागावाटपातही एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, विजय नाहटा तर भाजपाकडून आमदार संजय केळकर, मनोज कोटक ही तशी बाहेरचीच मंडळी होती. शिवसेनेच्या नेत्यांनी आयारामांच्या कुटुंबात २ ते ३ तिकिटे दिली. विजय चौगुले, विठ्ठल मोरे यासारख्या नेत्यांच्या घरातही २ ते ५ तिकिटे दिली. त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली. ती बंडखोरीच्या रूपाने उफाळून आली. साहजिकच सुमारे ४१ ठिकाणी बंडखोरी झाली. बंडखोरांनी उपऱ्या नेत्यांविरोधात बंड केले. शिवसेना पक्षप्रमुखांनी बंडखोरांची हकालपट्टी केली. दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी भाजपाच्या बंडखोरांवर मात्र कोणतीही कारवाई केली नाही. तेथेच शिवसेनेचा घात झाला. त्यांच्या ७ ते ८ जागा गेल्या. उपऱ्या नेत्यांमुळेच युतीचा घात झाला, तर माथाडींनी घणसोली-कोपरखैरण्यात साथ न दिल्याने राष्ट्रवादीच्या ४-५ जागा गेल्या.