शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

उपऱ्यांमुळे झाला शिवसेनेचा विचका

By admin | Updated: April 24, 2015 01:41 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही

नारायण जाधव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या सत्त्वपरीक्षेत गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. योग्य राजकीय डावपेच, शिवसेनेत उफाळून आलेली बंडखोरी याचा अचूक लाभ घेत त्यांनी १११पैकी ५२ जागा जिंकल्या आणि आपणच नवी मुंबईचे ‘दादा’ आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. शिवसेनेला ३८, भाजपाला ६, काँगे्रसला १० आणि अपक्षांना ५ जागा मिळाल्या असल्या तरी त्यात २ राष्ट्रवादी पुरस्कृत आणि २ बंडखोर असल्याने महापालिकेची सत्ता राखण्यासाठी आवश्यक असलेली ५६ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे नाईक यांना अवघड नाही. त्यातही त्यांनी काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. उपऱ्या नेत्यांकडे पक्षाची सूत्रे सोपविल्याने पोषक वातावरण असतानाही शिवसेनेला सत्तेचा सोपान चढणे कठीण गेले.महापालिकेतील घराणेशाहीमुळे गणेश नाईक यांच्याविरोधात नवी मुंबईत प्रचंड असंतोष होता. त्यातच विधानसभेतील पराभवामुळे नाईकांच्या गोटात नैराश्याचे वातावरण पसरले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी समर्थकांनी त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जाण्याचा आग्रह धरला. त्यावर नाईक यांनी मौन बाळगल्याने श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज तर झालेच; मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर पाटकर, शिवराम पाटील, अनिता पाटील, नारायण पाटील, एम. के. मढवी, विनया मढवी, मधुकर मुकादम यांनी शिवसेनेत तर कविता जाधव यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यासाठी सेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, आयारामांना पक्षात प्रवेश देताना नाहटा यांनी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंसह एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात घेतले नाही. युतीची बोलणी करायला आणि जागावाटपातही एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, विजय नाहटा तर भाजपाकडून आमदार संजय केळकर, मनोज कोटक ही तशी बाहेरचीच मंडळी होती. शिवसेनेच्या नेत्यांनी आयारामांच्या कुटुंबात २ ते ३ तिकिटे दिली. विजय चौगुले, विठ्ठल मोरे यासारख्या नेत्यांच्या घरातही २ ते ५ तिकिटे दिली. त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली. ती बंडखोरीच्या रूपाने उफाळून आली. साहजिकच सुमारे ४१ ठिकाणी बंडखोरी झाली. बंडखोरांनी उपऱ्या नेत्यांविरोधात बंड केले. शिवसेना पक्षप्रमुखांनी बंडखोरांची हकालपट्टी केली. दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी भाजपाच्या बंडखोरांवर मात्र कोणतीही कारवाई केली नाही. तेथेच शिवसेनेचा घात झाला. त्यांच्या ७ ते ८ जागा गेल्या. उपऱ्या नेत्यांमुळेच युतीचा घात झाला, तर माथाडींनी घणसोली-कोपरखैरण्यात साथ न दिल्याने राष्ट्रवादीच्या ४-५ जागा गेल्या.