शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

उपऱ्यांमुळे झाला शिवसेनेचा विचका

By admin | Updated: April 24, 2015 01:41 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही

नारायण जाधव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या सत्त्वपरीक्षेत गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. योग्य राजकीय डावपेच, शिवसेनेत उफाळून आलेली बंडखोरी याचा अचूक लाभ घेत त्यांनी १११पैकी ५२ जागा जिंकल्या आणि आपणच नवी मुंबईचे ‘दादा’ आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. शिवसेनेला ३८, भाजपाला ६, काँगे्रसला १० आणि अपक्षांना ५ जागा मिळाल्या असल्या तरी त्यात २ राष्ट्रवादी पुरस्कृत आणि २ बंडखोर असल्याने महापालिकेची सत्ता राखण्यासाठी आवश्यक असलेली ५६ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे नाईक यांना अवघड नाही. त्यातही त्यांनी काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. उपऱ्या नेत्यांकडे पक्षाची सूत्रे सोपविल्याने पोषक वातावरण असतानाही शिवसेनेला सत्तेचा सोपान चढणे कठीण गेले.महापालिकेतील घराणेशाहीमुळे गणेश नाईक यांच्याविरोधात नवी मुंबईत प्रचंड असंतोष होता. त्यातच विधानसभेतील पराभवामुळे नाईकांच्या गोटात नैराश्याचे वातावरण पसरले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी समर्थकांनी त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जाण्याचा आग्रह धरला. त्यावर नाईक यांनी मौन बाळगल्याने श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज तर झालेच; मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर पाटकर, शिवराम पाटील, अनिता पाटील, नारायण पाटील, एम. के. मढवी, विनया मढवी, मधुकर मुकादम यांनी शिवसेनेत तर कविता जाधव यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यासाठी सेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, आयारामांना पक्षात प्रवेश देताना नाहटा यांनी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंसह एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात घेतले नाही. युतीची बोलणी करायला आणि जागावाटपातही एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, विजय नाहटा तर भाजपाकडून आमदार संजय केळकर, मनोज कोटक ही तशी बाहेरचीच मंडळी होती. शिवसेनेच्या नेत्यांनी आयारामांच्या कुटुंबात २ ते ३ तिकिटे दिली. विजय चौगुले, विठ्ठल मोरे यासारख्या नेत्यांच्या घरातही २ ते ५ तिकिटे दिली. त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली. ती बंडखोरीच्या रूपाने उफाळून आली. साहजिकच सुमारे ४१ ठिकाणी बंडखोरी झाली. बंडखोरांनी उपऱ्या नेत्यांविरोधात बंड केले. शिवसेना पक्षप्रमुखांनी बंडखोरांची हकालपट्टी केली. दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी भाजपाच्या बंडखोरांवर मात्र कोणतीही कारवाई केली नाही. तेथेच शिवसेनेचा घात झाला. त्यांच्या ७ ते ८ जागा गेल्या. उपऱ्या नेत्यांमुळेच युतीचा घात झाला, तर माथाडींनी घणसोली-कोपरखैरण्यात साथ न दिल्याने राष्ट्रवादीच्या ४-५ जागा गेल्या.