शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

मतदान करून ते चढले बोहल्यावर

By admin | Updated: February 16, 2017 18:18 IST

मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला आहे.

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 16 - मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला.  या नवरदेव आणि नवरीने  सुरूवातील मतदान केले व त्यानंतर बोहल्यावर चढले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतू सद्यपस्थितीत अनेकजण मतदानासाठी मिळणाºया सुट्टीचाही दुरुपयोग करतात. मतदानाला मिळालेल्या सुट्टीला मतदान न करता बाहेरगावी फिरण्यात या सुट्टीचा आनंद घेताता. परिणामी मतदानाचा टक्का दिवसेंदिवस घटत चालला आहे. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील नवरदेव नवरीने सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावून त्यानंतर शुभमंगल केल्याचा प्रकार जि.प.व पं.स निवडणूकीच्या मतदान केंद्रावर समोर आला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे-लिहा सर्कलमधील ऊऱ्हा येथील सचिनसिंग राजपूर या युवकाने १६ फेब्रुवारीरोजी सकाळी सुरूवातीला मतदान
केले व त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढला. लग्नापेक्षाही मतदानाच्या अधिकाराला अधिक महत्व देणाऱ्या उऱ्हा येथील या युवकाचे आदर्श मतदान ठरले. त्यानंतर असाच प्रकार लोणार तालुक्यातील नांद्रा येथे घडला. आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने लग्णाच्या दिवशी सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतर लग्न मंडपात गेली. बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या या आदर्श मतदानाने मतदानाचे महत्व पटवून दिले आहे. दोन्ही ठिकाणच्या या नवरदेव नवरीने लग्नापेक्षा मतदानाला महत्त्व दिल्याने त्यांच्या मतदानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
 
अनिताने लग्नाच्या दिवशी मतदानाला दिले महत्त्व
  लोणार तालुक्यातील नांद्रा येथील आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने वराला वरमाला घालण्याअगोदर मतदानाचा अधिकार बजावला व मतदानाचे महत्व पटवून दिले. येथील आश्रुबा मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां.अनिता हिचा विवाह वाकद ता. रिसोड येथील कैलास निवृत्ती डोंगरे यांच्याशी १६ फेब्रुवारी रोजी लोणी सखाराम महाराज येथे पार पडला. यावेळी वधूने सकाळी मतदान केंद्रावर जाऊन प्रथम आपला मतदानाचा हक्क बजावला. उच्चशिक्षीत असलेल्या अनिताने लग्नाच्या घाईगर्दीत मतदान करण्याचा निर्णय सर्वांना नवल वाटणारा ठरला. तसेच लग्न सोहळा सुद्धा सर्व वायफळ खर्चांना फाटा देऊन अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय केला व अंमलात आणला. यामुळे या आदर्श वधुचा हा लग्नसोहळा एक आदर्शच ठरला. (वार्ताहर )