शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करून ते चढले बोहल्यावर

By admin | Updated: February 16, 2017 18:18 IST

मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला आहे.

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 16 - मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला.  या नवरदेव आणि नवरीने  सुरूवातील मतदान केले व त्यानंतर बोहल्यावर चढले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतू सद्यपस्थितीत अनेकजण मतदानासाठी मिळणाºया सुट्टीचाही दुरुपयोग करतात. मतदानाला मिळालेल्या सुट्टीला मतदान न करता बाहेरगावी फिरण्यात या सुट्टीचा आनंद घेताता. परिणामी मतदानाचा टक्का दिवसेंदिवस घटत चालला आहे. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील नवरदेव नवरीने सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावून त्यानंतर शुभमंगल केल्याचा प्रकार जि.प.व पं.स निवडणूकीच्या मतदान केंद्रावर समोर आला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे-लिहा सर्कलमधील ऊऱ्हा येथील सचिनसिंग राजपूर या युवकाने १६ फेब्रुवारीरोजी सकाळी सुरूवातीला मतदान
केले व त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढला. लग्नापेक्षाही मतदानाच्या अधिकाराला अधिक महत्व देणाऱ्या उऱ्हा येथील या युवकाचे आदर्श मतदान ठरले. त्यानंतर असाच प्रकार लोणार तालुक्यातील नांद्रा येथे घडला. आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने लग्णाच्या दिवशी सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतर लग्न मंडपात गेली. बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या या आदर्श मतदानाने मतदानाचे महत्व पटवून दिले आहे. दोन्ही ठिकाणच्या या नवरदेव नवरीने लग्नापेक्षा मतदानाला महत्त्व दिल्याने त्यांच्या मतदानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
 
अनिताने लग्नाच्या दिवशी मतदानाला दिले महत्त्व
  लोणार तालुक्यातील नांद्रा येथील आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने वराला वरमाला घालण्याअगोदर मतदानाचा अधिकार बजावला व मतदानाचे महत्व पटवून दिले. येथील आश्रुबा मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां.अनिता हिचा विवाह वाकद ता. रिसोड येथील कैलास निवृत्ती डोंगरे यांच्याशी १६ फेब्रुवारी रोजी लोणी सखाराम महाराज येथे पार पडला. यावेळी वधूने सकाळी मतदान केंद्रावर जाऊन प्रथम आपला मतदानाचा हक्क बजावला. उच्चशिक्षीत असलेल्या अनिताने लग्नाच्या घाईगर्दीत मतदान करण्याचा निर्णय सर्वांना नवल वाटणारा ठरला. तसेच लग्न सोहळा सुद्धा सर्व वायफळ खर्चांना फाटा देऊन अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय केला व अंमलात आणला. यामुळे या आदर्श वधुचा हा लग्नसोहळा एक आदर्शच ठरला. (वार्ताहर )