शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एका तपानंतर २,४०० शाळांचा प्रश्न अखेर सुटला

By admin | Updated: March 20, 2017 03:38 IST

शाळेला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर शाळेचे प्लॅनमधून नॉनप्लॅनमध्ये रूपांतर केले जाते. पण गेल्या १२ वर्षांत हे रूपांतर न केल्यामुळे

मुंबई : शाळेला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर शाळेचे प्लॅनमधून नॉनप्लॅनमध्ये रूपांतर केले जाते. पण गेल्या १२ वर्षांत हे रूपांतर न केल्यामुळे मुंबईतील २ हजार ४०० प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा करावी लागायची. १२ वर्षांनंतर आता प्रतीक्षा संपली असून वेळेवर पगार मिळणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर पहिली पाच वर्षे ‘प्लॅन’मध्ये असते. त्यामुळे या वर्षांत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा राज्य शिक्षण आणि वित्त विभागाने दिलेल्या निधीतून दिला जातो. निधी उपलब्ध असेपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळतो. सर्वसाधारणपणे मे ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पगार नियमित मिळतात. पण त्यानंतर निधीची कमतरता भासायला लागते. या वेळी वारंवार पाठपुरावा करूनही दोन ते तीन महिने पगार रखडतात. गेल्या १२ वर्षांपासून प्लॅन शाळांचे रूपांतर ‘नॉनप्लॅन’मध्ये न केल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. अखेर सर्वच शाळा नॉनप्लॅन होणार असल्याने पगाराची प्रतीक्षा संपेल, असा विश्वास मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)