शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

सत्तापालटानंतरही खर्चाची परंपरा कायम

By admin | Updated: November 13, 2014 00:57 IST

राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नव्याने सत्तारुढ झालेले भाजप सरकारचे मंत्री सांगत असले तरी खर्चात मात्र कुठलीही काटकसर होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल

अधिवेशनाची तयारी : देखभाल दुरुस्तीसाठी लागणार सात कोटीनागपूर: राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नव्याने सत्तारुढ झालेले भाजप सरकारचे मंत्री सांगत असले तरी खर्चात मात्र कुठलीही काटकसर होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल ठेवत विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री,आमदार यांच्या निवास व्यवस्थेवर आणि इतरही कामांवर सरासरी सात कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे किती प्रश्न सुटतात हा प्रश्न जसा वादग्रस्त ठरतो तसाच अधिवेशनाच्या निमित्ताने येणारे आमदार आणि मंत्री यांची निवास व्यवस्था आणि तत्सम कामांवर किती खर्च होतो हा सुद्धा मुद्दा दरवर्षी चर्चिला जातो. आतापर्यंत विरोधी बाकावर बसून भाजपने यावर अनेक वेळा टीकाही केली. आता हाच पक्ष सत्तेवर आला आहे. गत सरकारने तीन लाख कोटींचे कर्ज करून ठेवल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केला असून राज्य काटकसरीनेच चालवावे लागेल, असे संकेतही त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षी होणाऱ्या खर्चात काही कपात केली जाते का याकडे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानभवन व रविभवन, आमदार निवास आदींच्या देखभाल दुरुस्तीवर तसेत सौंदर्यीकरणाच्या कामावर सरासरी सात कोटीच्या वर खर्च होणार असल्याची माहिती आहे. दरवर्षी यावर जवळपास एवढाच खर्च करण्यात येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे केली जातात. यंदाही अधिवेशनाच्या निमित्ताने या विभागाने कामाला सुरुवात केली आहे. भाजप सरकारचे नागपूरमध्ये होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. नवा गडी नवा राज असेच त्याचे स्वरूप असेल. मंत्रीही नवीन असतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवनात तर आमदारांची आमदार निवासात केली जाते. मुंबईहून येणाऱ्या पत्रकारांचा मुक्काम सुयोगमध्ये असतो. विधानभवन, रविभवन व सुयोगच्या देखभाल दुरुस्तीवर ४ कोटी ८५ लाख रुपये तर आमदार निवास आणि इतर व्यवस्थेवर अडीच कोटी रुपये खर्च होणार आहे. विधानभवनाची रंगरगोटी, रस्ते दुरुस्ती आणि सौेंदर्यीकरणावरही दरवर्षी खर्च केला जातो. हा अवास्तव खर्च आहे, अशी टीका करणाऱ्यांचे सध्या सरकार असले तरी यंदा त्यात काहीही बदल झालेला नाही. (प्रतिनिधी)