शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सत्तापालटानंतरही खर्चाची परंपरा कायम

By admin | Updated: November 13, 2014 00:57 IST

राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नव्याने सत्तारुढ झालेले भाजप सरकारचे मंत्री सांगत असले तरी खर्चात मात्र कुठलीही काटकसर होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल

अधिवेशनाची तयारी : देखभाल दुरुस्तीसाठी लागणार सात कोटीनागपूर: राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नव्याने सत्तारुढ झालेले भाजप सरकारचे मंत्री सांगत असले तरी खर्चात मात्र कुठलीही काटकसर होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल ठेवत विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री,आमदार यांच्या निवास व्यवस्थेवर आणि इतरही कामांवर सरासरी सात कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे किती प्रश्न सुटतात हा प्रश्न जसा वादग्रस्त ठरतो तसाच अधिवेशनाच्या निमित्ताने येणारे आमदार आणि मंत्री यांची निवास व्यवस्था आणि तत्सम कामांवर किती खर्च होतो हा सुद्धा मुद्दा दरवर्षी चर्चिला जातो. आतापर्यंत विरोधी बाकावर बसून भाजपने यावर अनेक वेळा टीकाही केली. आता हाच पक्ष सत्तेवर आला आहे. गत सरकारने तीन लाख कोटींचे कर्ज करून ठेवल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केला असून राज्य काटकसरीनेच चालवावे लागेल, असे संकेतही त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षी होणाऱ्या खर्चात काही कपात केली जाते का याकडे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानभवन व रविभवन, आमदार निवास आदींच्या देखभाल दुरुस्तीवर तसेत सौंदर्यीकरणाच्या कामावर सरासरी सात कोटीच्या वर खर्च होणार असल्याची माहिती आहे. दरवर्षी यावर जवळपास एवढाच खर्च करण्यात येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे केली जातात. यंदाही अधिवेशनाच्या निमित्ताने या विभागाने कामाला सुरुवात केली आहे. भाजप सरकारचे नागपूरमध्ये होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. नवा गडी नवा राज असेच त्याचे स्वरूप असेल. मंत्रीही नवीन असतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवनात तर आमदारांची आमदार निवासात केली जाते. मुंबईहून येणाऱ्या पत्रकारांचा मुक्काम सुयोगमध्ये असतो. विधानभवन, रविभवन व सुयोगच्या देखभाल दुरुस्तीवर ४ कोटी ८५ लाख रुपये तर आमदार निवास आणि इतर व्यवस्थेवर अडीच कोटी रुपये खर्च होणार आहे. विधानभवनाची रंगरगोटी, रस्ते दुरुस्ती आणि सौेंदर्यीकरणावरही दरवर्षी खर्च केला जातो. हा अवास्तव खर्च आहे, अशी टीका करणाऱ्यांचे सध्या सरकार असले तरी यंदा त्यात काहीही बदल झालेला नाही. (प्रतिनिधी)