शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षकांची निवृत्ती साठीनंतर

By admin | Updated: June 30, 2016 04:38 IST

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याचा आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बदलण्यात आला

मुंबई : राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याचा आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बदलण्यात आला असून सेवानिवृत्तीचे वय आता पुन्हा ६० वर्षे करण्यात आले आहे. तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे आणण्यासाठी खुद्द उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच विभागातील अधिकाऱ्यांशी झगडावे लागल्याचे वृत्त आहे.सेवानिवृत्तीचा हा प्रस्ताव मागील आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीपुढे यावा अशी आग्रही मागणी मंत्री तावडे यांनी धरली होती. विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे रजेवर असल्यामुळे तात्पुरता पदभार सचिव महेश पाठक यांच्याकडे होता. याआधी वयोमर्यादा वाढीचा निर्णय घेताना आपणच तो प्रस्ताव तयार केला होता, त्यावर आपली सही होती. त्यामुळे आता तो निर्णय बदलताना आपणच पुन्हा कशी सही करायची, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र सरकार म्हणजे अधिकारी नव्हेत. अधिकाऱ्यांना कधीपासून अशा भूमिका घेता येऊ लागल्या, असा सवाल करीत तावडे यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांच्याकडे तक्रारही केली होती. आजच प्रस्ताव आणा नाहीतर आपल्याला सचिव बदलून द्या, असेही तावडे यांनी सांगितल्याचे समजते. एवढे सगळे रामायण घडूनही हा प्रस्ताव मागच्या बैठकीत आलाच नाही. दोन दिवसापूर्वी कुंटे रजेवरुन हजर झाले आणि प्रस्तावाची फाईल पुढे सरकत आज मंत्रिमंडळ बैठकीत पोहोचली. (विशेष प्रतिनिधी)>निर्णय कोणाला लागू?राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित शासकीय तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था आणि महाविद्यालयांमधील अध्यापक, त्याचप्रमाणे अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक, ग्रंथपाल, उपग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल तसेच संचालक, उपसंचालक व सहायक संचालक, शारीरिक शिक्षण या सगळ्यांना हा निर्णय लागू असेल.उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे असेल. वयाच्या ६२ वर्षानंतर प्राचार्यांना मुदतवाढ देण्यापूर्वी त्यांच्या कामकाजाचा विहित समितीकडून आढावा होणार. समितीच्या शिफारशीनुसार त्यांना कमाल ६५ वर्षापर्यंत मुदतवाढ दिली जाईल. त्यापुढे मुदतवाढ नसेल.