शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पंतप्रधानांना निवृत्तीनंतर वीज, पाणी मोफत

By admin | Updated: May 8, 2014 14:19 IST

नगर विकास मंत्रालयाने निवृत्तीनंतर सरकारी घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडून आकारण्याच्या शुल्कासंबंधीच्या आधीच्या आदेशात बदल केला आहे.

नियमांत बदल : डॉ. सिंग साधेपणाने राहणार, निकालापूर्वीच सध्याचे निवासस्थान सोडणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवे सरकार अधिकारावर आल्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवृत्तीनंतरच्या वास्तव्यासाठी मोतीलाल नेहरू मार्गावरील सरकारी बंगल्यात वास्तव्यास जातील तेव्हा त्यांना तेथे मोफत वीज व पाणी पुरविण्याची सोय संपुआ सरकारने केली आहे. यासाठी नगर विकास मंत्रालयाने निवृत्तीनंतर सरकारी घरांमध्ये राहणार्‍या व्यक्तींकडून आकारण्याच्या शुल्कासंबंधीच्या आधीच्या आदेशात बदल केला आहे. अर्थात या बदललेल्या नियमाचा फायदा एकट्या डॉ. सिंग यांना मिळणार नसून निवृत्तीनंतर नवी दिल्लीत सरकारी बंगल्यांमध्ये राहणार्‍या सर्वच माजी पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना व उपराष्ट्रपतींना मिळणार आहे. विद्यमान खासदारांनाही त्यांच्या सरकारी घरासाठी पुरविल्या जाणार्‍या वीज व पाण्याचे बिल एका ठराविक मर्यादेपर्यंत माफ करण्याची तरतूद आहे. मात्र नव्या सुधारित नियमानुसार पंतप्रधांनाच्या बाबतीत अशी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. Þडॉ. सिंग यांना निवृत्तीनंतर विरोधी पक्षनेत्यास लागू असलेल्या सोयी-सुविधा मिळतील. त्यानुसार त्यांना व्यक्तिगत कर्मचारी म्हणून १४ जणांची नेमणूक करता येईल व किरकोळ खर्चासाठी त्यांना दरमहा सहा हजार रुपये भत्ता मिळेल. याखेरीज सरकारी बंगल्यासाठी त्यांना दरमहा १,२०० रुपये एवढे नाममात्र भाडे आकारण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. डॉ. सिंग निवृत्तीनंतर ज्या ‘टाईप-आठ’च्या सरकारी बंगल्यात वास्तव्यास जाणार आहेत तो २.५ एकर एवढ्या प्रशस्त आवारात असून त्यास कर्मचारी निवासस्थानेही स्वतंत्र आहेत. आता केरळच्या राज्यपाल असलेल्या शीला दिक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हा हा बंगला त्यांचे सरकारी निवासस्थान होते. आपल्या वास्तव्यासाठी हा बंगला तयार करताना डागडुजी व रंगरंगोटीवर वारेमाप खर्च न करता तो साधेपणाने तयार करावा, अशा सूचना डॉ. सिंग यांनी आपल्या कार्यालयास आधीच दिल्या आहेत. तसेच फर्निचर, ए.सी. व रेफ्रिजरेटर यासारख्या गोष्टींवरचा खर्च २.५ लाख रुपये या मंजूर मर्यादेतच करण्यासही त्यांनी सांगितले आहे. (लोेकमत न्यूज नेटवर्क)

सूत्रांनी सांगितले की, आधी या बंगल्यात शीला दीक्षित वास्तव्यास होत्या तेव्हा तेथे २६ एसी बसविलेले होते. त्यांनी बंगला सोडल्यानंतर हे सर्व एसी काढण्यात आले. आता आपल्यासाठी या बंगल्यात चार ते पाचपेक्षा जास्त एसी बसवू नयेत, अशी विनंती डॉ. सिंग यांनी केली आहे. ४लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी लागणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी आपण आपल्या निवृत्तीनंतरच्या या घरात राहायला जाऊ, असे डॉ. सिंग यांनी कळविले होते. त्यादृष्टीने बंगल्यात करायच्या दुरुस्त्या व डागडुजीचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविले होते; पण ते शक्य झालेले नाही.

 याचे कारण सांगताना एका अधिकार्‍याने सांगितले की, शीला दीक्षित राहात होत्या तेव्हा या बंगल्यात सगळीकडे ‘वूडन फ्लोरिंग’ होते; परंतु आपल्याला ते नको, साधी फरसबंदी करावी, अशी इच्छा डॉ. सिंग यांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘वूडन फ्लोरिंग’ काढले गेले. पण ते करताना खालच्या लादीच्या फ्लोरिंगचे नुकसान झाले. त्यामुळे ते पूर्णपणे नव्याने करावे लागले.