शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

‘राजीनामास्त्रा’नंतर कामतांची मनधरणी

By admin | Updated: May 4, 2017 05:04 IST

ज्येष्ठ नेते-माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता थेट दिल्लीहून

मनोहर कुंभेजकर / मुंबईज्येष्ठ नेते-माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता थेट दिल्लीहून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुजरातचे प्रभारी म्हणून कामत यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलेला असला तरी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा आणि राजस्थानचे प्रभारी म्हणून त्यांनी दिलेला राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अजून तरी स्वीकारलेला नाही. सध्या भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामत यांनी पुन्हा पक्षकार्यात जोमाने सहभागी व्हावे, यासाठी दिल्लीहून प्रयत्न सुरु झाले आहे. कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत काँग्रेसचे भवितव्य काय असेल? यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता खाजगीत चर्चा रंगू लागल्या आहेत. विद्यार्थीदशेपासून काँंग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या कामत यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात आहेत. दर शनिवार आणि रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत त्यांना अंधेरी (प) डी. एन. नगर येथील वर्सोवा पोलीस ठाण्यालगत असलेल्या त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असे. विशेष म्हणजे अजूनही ही गर्दी कमी झालेली नाही. तथापि, त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि कार्यकर्ते सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत.मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीबद्दल कामत कमालीचे नाराज होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले होते. याबाबत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेवून ही बाब त्यांना सांगितली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गुरुदास कामत हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असतांना त्यांच्या नेतृबाखाली मुंबई महानगर पालिकेत काँग्रेसने ८९ जागा जिंकल्या होत्या, हे विसरता येणार नसल्याचे मुंबईतील एका वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. कामत यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला काँग्रेसच्या मुंबईच्या प्रक्रियेत डावल्यामुळे मुंबईचे पडसाद राज्यात उमटले. अलीकडेच राज्यात झालेल्या विविध ठिकाणच्या महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे मातब्बर नेते आहेत, त्यांच्या नेमणूका कामत यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना केल्या होत्या, अशी माहितीही काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. राहुल गांधी आतातरी लक्ष देणार का?

२०१२ च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ५१ नगरसेवक निवडून आले होते,आणि २०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ३१ नगरसेवक विजयी झाले, हे विशेष. काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर कामत भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु त्यांनी मात्र या वृत्ताचे खंडन करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सुतोवाच केले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना कामत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेसचे सर्व ६ खासदार निवडून आले होते. सध्याच्या मुंबई काँग्रेसच्या दिशाहीन अवस्थेला आणि ढासळत्या आलेखाकडे राहुल गांधी आता तरी लक्ष घालणार का? कामत यांच्यासारख्या निष्ठावान आणि अनुभवी नेत्याशी चर्चा करून डावललेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणून मुंबई काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार का? असे प्रश्न मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.