शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मंगळ मोहिमेनंतर जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला

By admin | Updated: March 14, 2016 18:14 IST

इस्रोने मंगळयानाची जबाबदारी आमच्यावर टाकली ती यशस्वी करून दाखवली आणि त्यानंतरअन्य देशाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला ‘स्ट्रेन्थ रिस्पेक्ट स्ट्रेन्थ’ हा जगाचा परवलीचा शब्द आहे’

सोलापूर : भविष्यात अभियांत्रिकी शिक्षणाला कौशल्य विकास आणि प्रात्यक्षिक अनुभवाची जोड दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. इस्रोने मंगळयानाची जबाबदारी आमच्यावर टाकली ती यशस्वी करून दाखवली आणि त्यानंतरअन्य देशाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला ‘स्ट्रेन्थ रिस्पेक्ट स्ट्रेन्थ’ हा जगाचा परवलीचा शब्द आहे’ असे मत वैज्ञानिक तथा सर्वोकंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक दीपक धडोती यांनी व्यक्त केले. वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीमध्ये आयोजित व्याख्यानानिमित्त आलेले धडोती यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखतीत दिली. त्यांनी आपला संघर्षपूर्ण यशस्वी जीवनपट उलगडताना सर्वश्रेय आई सरोजला दिले.

 

कर्नाटकातील शहापूर हे धडोती यांचे मूळ गाव आहे. बेळगांवीच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ८ नं. शाळेतुन त्यांनी शिक्षणाची सुरूवात केली आणि के.ई.एल. इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल विभागातून पदवी घेऊन बाहेर पडले. शिक्षणाविषयी ते म्हणाले की, कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एकमेव कॉम्प्युटर होता. तो कॉम्प्युटर पहिल्यांदा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जायचा आणि त्यानंतर बी.ई. च्या विद्यार्थ्यांना मिळायचा. मला तो पहाटे ३ ते ६ या वेळेतच अभ्यासाला मिळायचा. त्यावेळेत मी पहिला प्रोजेक्ट केला. त्याला कर्नाटक राज्याने आणि कर्नाटक विद्यापीठाने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले. हा क्षण माझ्यासाठी कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर अमेरिकेच्या मूग कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. भारतासह जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली, हाँगकाँग, सिंगापूर अशा विविध राष्ट्रात मला काम करण्याची संधी मिळत गेली. २0१३ मध्ये मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी संपूर्णपणे भारतीय बनावटीचे यान पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

७५ हजार कि.मीचा अंतराळ प्रवास अनेक गुरूत्वाकर्षणाला समोरे जात यानाचा साडेआठ महिन्याचा प्रवास होता. यामध्ये सोलार पॅनलची डीश आणि अ‍ॅन्टेनाचा रिमोटची डीश महत्वाची होती. यानाच्या यशस्वी प्रवासासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सेन्सरची आवश्यकता असते. तर ३२ पैक २७ सेन्सरची निर्मिती आमच्या कंपनीने करून एक यशस्वी मंगळग्रहापर्यंतचा प्रवास जगापुढे आणला आणि आज जगामध्ये भारतीय वैज्ञानिकांनाचा मान वाढला. या यशस्वी मंगळप्रवासाचे श्रेय वैज्ञानिक विक्रमभाई सारा यांनाच दिले पाहिजे, असेही धडोती यांनी सांगितले. देश, परदेशात अभियांत्रिकी क्षेत्राला खुप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी, पेस्टवर भर न देता प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला पाहिजे, असा कानमंत्र देऊन त्यांनी आज अनेक संशोधन विद्यापीठात, महाविद्यालयात पडुन आहेत त्याचे मार्केटींग होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 

भारताने १९९८ मध्ये पोखर अणुचाचणी यशस्वी केली. त्यामुळे महासत्ताक अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध टाकले. त्यावेळी इस्त्रोच्या संचालकपदी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम होते. परदेशात काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांना डॉ. कलाम यांनी भारतात परतण्याचे आवाहन केले. त्यानुसार मी मायदेशी परतलो. डॉ. कलाम यांनी भाभा संशोधन केंद्रामधील रिअ‍ॅक्टरच्या बिघाडाच्या दुरूस्तीची जबाबदारी माझ्यावर सोपवली.ती यशस्वीरित्या पेलल्यामुळे मला सर्वोकंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रा. लि. ची स्थापना करणे शक्य झाले. आज भारताने अवकाशात पाठविलेल्या प्रत्येक सॅटेलाईटसाठी आमच्या कंपनीचे योगदान असते, याचा मला अभिमान आहे.’’