शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

‘कळसुबाई’ सर केल्यानंतर ‘आकाश’ची नजर आता ‘एव्हरेस्ट’वर

By admin | Updated: August 12, 2015 23:12 IST

त्याने आकाशाची उंची गाठण्याचे, आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहिलेच. त्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

प्रकाश वराडकर-रत्नागिरी  घरची परिस्थिती अगदीच बेताची. शिक्षणाचा खर्च कसा करायचा, हा यक्ष प्रश्न. वडिलांचे कृपाछत्रही आधीच हरपलेले. साडेतीन ते चार हजार रुपये महिना पगारावर काम करणारा भाऊ घराचा पोशिंदा. या स्थितीत एखादे स्वप्न पाहायचे म्हणजे ते स्वप्नच राहण्याची भीती होती. तरीही त्याने आकाशाची उंची गाठण्याचे, आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहिलेच. त्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांतून त्याने महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेले कळसुबाईचे शिखर सर केले. आता हे शिखर सर केल्यानंतर त्याची नजर लागली आहे ती एव्हरेस्टवर. हे शिखरही त्याला सर करायचे आहे. ही महत्त्वाकांक्षा असलेल्या आकाश प्रमोद पालकर या विद्यार्थ्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी आर्थिक मदतीचे पंख हवेत. ते नक्की मिळतील, अशी आशा त्याला आहे. आकाश पालकर हा सध्या वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे बारावीमध्ये शिकत आहे. आडी शिरगाव येथे राहणाऱ्या आकाशचे वडील हयात नाहीत. आई गावामध्येच मोलमजुरी करते. त्यामुळे घरचे दोन वेळचे जेवण मिळविताना कसरत होते. या स्थितीत शिक्षणासाठी आर्थिक जुळवणी करतानाही नाकीदम येतो. तरीही आकाश व त्याच्या कुटुंबियांनी हार मानलेली नाही. बारावीत शिक्षण घेणारा आकाश टीआरपी, रत्नागिरी येथे संगणक शिक्षणासाठी जातो. त्यासाठीही त्याचे काका प्रशांत देऊ पालकर यांनी त्याला मदत केली आहे. अपंगत्व असतानाही अरुनिमा सिन्हा यांनी एव्हरेस्ट सर केले. त्यांची त्याबाबतची चित्रफीत पाहून आकाशचे मनही एव्हरेस्टवर भिरभिरू लागले. त्याने एव्हरेस्टबाबत माहिती मिळविण्यास सुरूवात केली. त्यानंतर आकाशने चवेकर सर, नेत्रा ठाकुर, कुवारबावचे धीरज पाटकर यांच्याकडे आपली एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा व्यक्त केली. या सर्वांनी आकाशला खूप मदत केली. त्यानंतर आकाशने पहिला ट्रेक पनवेलमध्ये ठाकुरवाडी येथे केला. त्यावेळीही त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने दुसऱ्यांची मदत घेतली. नंतर दुसरा ट्रेक केला. राज्यातील सर्वात उंच म्हणजेच १६४६ मीटर उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले. त्यावेळी झालेला आनंद हा आकाशने आकाशाला हात लावल्यासारखाच होता. त्यावेळीही आकाशकडे पैसे नव्हते. त्याला चुलते संतोष नारायण पालकर यांनी आर्थिक मदत केली. आता एव्हरेस्ट शिखर सर करायचे हे आकाशचे स्वप्न आहे, त्यासाठी तो झगडतो आहे. आकाशची महत्त्वाकांक्षा आहे ती देशातील सर्वाेच्च असे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची. कळसुबाई शिखर सर केल्यानंतर त्याची ही महत्त्वाकांक्षा अधिक भक्कम बनली आहे. हे शिखरही सर करता येईल, असा त्याला आत्मविश्वास वाटतो आहे. मात्र, आर्थिक बाजू लंगडी असताना त्याच्या या महत्त्वाकांक्षेला, त्याच्या जिद्दीला आर्थिक बळाचे पंख कोण पुरविणार, असा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तो आपल्या मित्रांपैकी कोणाचे पालक मदत करू शकतील काय, कोणी आर्थिक बळाचे पंख देईल काय, यासाठी सातत्याने धडपड करतो आहे. त्याच्या या ‘महत्त्वाकांक्षेचे एव्हरेस्ट’ शिखर सर करण्याचे बळ त्याला मिळो, हीच अपेक्षा त्याच्या मित्रांमधूनही व्यक्त होत आहे.