शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

रब्बीच्या मशागतीनंतर खरीपाच्या पीक नुकसानाचे पंचनामे

By admin | Updated: November 4, 2016 02:08 IST

पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.

संतोष येलकरअकोला, दि. ३- परतीच्या पावसामुळे जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण प्रशासनामार्फत करण्यात येत आहे; मात्र रब्बी पेरण्यांसाठी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे केल्यानंतर पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आल्याने, नुकसानाचे पंचनामे कसे करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार विलंबाने सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.जिल्हय़ात गत ४ ऑक्टोबरपर्यंंत परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच उडीद व कापूस पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर यावर्षीच्या खरीप हंगामात गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे शेती पिके व फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालक (विस्तार शिक्षण)मार्फत १९ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुषंगाने गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या नुकसानासह खरबडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) दिला. त्यानुसार गत पाच दिवसांपासून जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या संयुक्त पथकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र यावर्षीच्या रब्बी हंगामातील पेरण्या गत १५ दिवसांपासून सुरू झाल्या. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर आणि रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या सर्वेक्षणात नुकसान झालेल्या शेतातील पीक नुकसानाची माहिती सर्वेक्षण करणार्‍या पथकांकडून कशी नोंदविली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचा आदेश शासनामार्फत विलंबाने प्राप्त झाल्याने, सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरणार आहे.पिकांचे नुकसान दिसणार कसे?रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच रब्बीच्या पेरण्याही सुरू झाल्या. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या पंचनाम्यात सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे नुकसान दिसणार कसे आणि यासंबंधीची माहिती सर्वेक्षण करणार्‍या पथकांकडून कशी नोंदविण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.