शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

रब्बीच्या मशागतीनंतर खरीपाच्या पीक नुकसानाचे पंचनामे

By admin | Updated: November 4, 2016 02:08 IST

पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.

संतोष येलकरअकोला, दि. ३- परतीच्या पावसामुळे जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण प्रशासनामार्फत करण्यात येत आहे; मात्र रब्बी पेरण्यांसाठी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे केल्यानंतर पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आल्याने, नुकसानाचे पंचनामे कसे करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार विलंबाने सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.जिल्हय़ात गत ४ ऑक्टोबरपर्यंंत परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच उडीद व कापूस पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर यावर्षीच्या खरीप हंगामात गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे शेती पिके व फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालक (विस्तार शिक्षण)मार्फत १९ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुषंगाने गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या नुकसानासह खरबडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) दिला. त्यानुसार गत पाच दिवसांपासून जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या संयुक्त पथकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र यावर्षीच्या रब्बी हंगामातील पेरण्या गत १५ दिवसांपासून सुरू झाल्या. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर आणि रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या सर्वेक्षणात नुकसान झालेल्या शेतातील पीक नुकसानाची माहिती सर्वेक्षण करणार्‍या पथकांकडून कशी नोंदविली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचा आदेश शासनामार्फत विलंबाने प्राप्त झाल्याने, सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरणार आहे.पिकांचे नुकसान दिसणार कसे?रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच रब्बीच्या पेरण्याही सुरू झाल्या. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या पंचनाम्यात सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे नुकसान दिसणार कसे आणि यासंबंधीची माहिती सर्वेक्षण करणार्‍या पथकांकडून कशी नोंदविण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.