शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

पावसानंतर काढणार जलपर्णी

By admin | Updated: July 4, 2016 01:58 IST

महापालिकेकडून वेगवेगळ्या मार्गाने करदात्यांच्या पैशांची लूट सुरूच आहे.

पिंपरी : महापालिकेकडून वेगवेगळ्या मार्गाने करदात्यांच्या पैशांची लूट सुरूच आहे. धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पवना नदीतील जलपर्णी काढण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात नदीपात्रातील जलपर्णी वाहून जाणार, हे माहीत असतानाही जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, तसेच मुळा नदी वाहते. या नद्यांच्या पात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होते. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना डास, चिलटे, दुर्गंधी आदींचा त्रास होतो. यासह नदीचेही विद्रूपीकरण होते. यामुळे नदी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांकडून जलपर्णी काढण्याची मागणी केली जाते. जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडूनही नियोजन केले जाते. बऱ्याचदा हे काम ठेकेदारामार्फत केले जाते. मात्र, त्यांच्याकडून वेळेत काम पूर्ण होत नाही. कामाचे बिल मात्र ठेकेदाराला अदा केले जाते, असा अनेक वर्षांचा अनुभव आहे. दिलेल्या मुदतीत जलपर्णी काढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, ठेकेदार पावसाची वाट पाहत असतात, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, पाऊस झाल्यास पावसाच्या पाण्यात सर्व जलपर्णी वाहून जाते. त्यामुळे आयत्यारीत्या जलपर्णी गेल्यानंतर ठेकेदाराचीही चांदी होते. यातून एक प्रकारे करदात्यांच्या पैशांची लूट केली जाते. याचप्रकारे यंदाच्या वर्षीही असाच प्रकार सुरू आहे. पावसाळा सुरू झाला असताना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची महापालिकेने सुरू केली आहे.महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम क्षेत्रीय कार्यालय स्तरावर मनुष्यबळाद्वारे करण्यातयेत होते. मात्र, आवश्यक त्या वेगाने काम पूर्ण होत नसल्याने आता खासगी संस्थेकडून यंत्राच्या साहाय्याने जलपर्णी काढण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)संबंधित खासगी संस्थेस विनानिविदा थेट पद्धतीने करारनामा करून एक महिन्यापर्यंत किंवा आवश्यक कालावधीपर्यंत काम देण्यास, तसेच त्यासाठी येणाऱ्या सहा लाखांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवण्यात आला आहे. पाऊस सुरू झाल्याने पाण्याच्या वेगाने जलपर्णी वाहून जाणार, याची कल्पना असतानाही करदात्यांचे पैसे ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. हे प्रकार रोखण्यासाठी जागरुक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.