शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

पाच वर्षे मानधन मगच कायम, राज्य शासनाचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:40 IST

आधी पाच वर्षे मानधनावर नोकरी करा, त्यानंतर तुमची पात्रता व कामगिरी तपासून तुम्हाला नियमित वेतनश्रेणी लागू केली जाईल, असा राज्य शासनातील नवीन ३६ हजार पदे भरतानाचा फॉर्म्युला असेल.

मुंबई : आधी पाच वर्षे मानधनावर नोकरी करा, त्यानंतर तुमची पात्रता व कामगिरी तपासून तुम्हाला नियमित वेतनश्रेणी लागू केली जाईल, असा राज्य शासनातील नवीन ३६ हजार पदे भरतानाचा फॉर्म्युला असेल. या फॉर्म्युल्याला अधिकारी, कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेत राज्य शासकीय सेवेत पहिल्या वर्षी ३६ हजार तर दुसऱ्या वर्षी ३६ हजार अशी ७२ हजार पदे भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार वित्त विभागाने गुरुवारी काढलेल्या शासन निर्णयात ही पदे मानधन तत्त्वावर पाच वर्षांसाठी भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कृषी आणि ग्रामविकास हे दोन विभाग सक्षम करून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विकास, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, गृह, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मृद व जलसंधारण आणि वित्त विभागातील पदे भरण्यात येतील. पाच वर्षांपर्यंत अधिकारी, कर्मचाºयांना मानधनावर घेतल्याने सरकारवर कमी आर्थिक बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग नवीन कर्मचाºयांना किमान पाच वर्षे तरी लागू करण्याची त्यामुळे आवश्यकता नसेल. त्यामुळे त्याही आर्थिक जबाबदारीतून सरकारची सुटका होणार आहे.राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी पाच वर्षे मानधनावर कर्मचारी भरती करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. नवीन कर्मचाºयांना पहिल्या दिवसापासूनच वेतनश्रेणी लागू केली पाहिजे, ही महासंघाची मागणी असल्याचे ते म्हणाले.>शिक्षण सेवकांच्या धर्तीवर होणार भरतीशिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्राम सेवकांची भरती ही आघाडी सरकारच्या काळापासूनच सुरुवातीला मानधन तत्त्वावर आणि नंतर कायमस्वरुपी नोकरी अशी केली जाते. मात्र, आता या सरकारने पद भरतीसाठी पाच वर्षांच्या मानधनाचा फॉर्म्युला पहिल्यांदाच आणला आहे.पहिल्या वर्षी ३६ हजार तर दुसºया वर्षी ३६ हजार अशी ७२ हजार पदे भरण्यात येतील. एरवी किरकोळ महत्त्वाचे शासकीय निर्णयही शासनाच्या वेबसाइटवर टाकले जातात पण पद भरतीबाबतचा जीआर वित्त विभागाने वेबसाईटवर टाकण्याचे टाळले.