शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनानंतर शेतमालाचे दर वाढले !

By admin | Updated: June 21, 2017 01:28 IST

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच, २०१४ नंतर देशात तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाच्या किमान खरेदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच, २०१४ नंतर देशात तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाच्या किमान खरेदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. देशातील प्रमुख राज्यांत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शेतमालाला दर वाढून मिळाले आहेत, हे विशेष. सामान्य प्रकारच्या तांदळाच्या दरात ५.४ टक्के वाढ झाली असून, प्रति क्विंटलसाठी हे दर १,५५० रुपये आहेत. कापसाच्या दरातही दीर्घकाळानंतर वाढ करीत, हे दर १ जुलैपासून प्रति क्विंटलसाठी ४,३२० रुपये करण्यात आले आहेत. तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाचे दर वाढवावेत, यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाले होते. यासोबतच शेतकऱ्यांनी कर्जमाफीचीही मागणी केली होती. सरकार दोन डझनपेक्षा अधिक कृषी उत्पन्नाचे किमान खरेदीचे दर ठरविते. अर्थात, सरकार प्रामुख्याने गहू आणि तांदळाची खरेदी करते. कांदा, टोमॅटो आणि बटाटे यांच्या दरात घसरण झाल्यामुळे आणि सरकार या शेतमालाला रास्त दर देऊ न शकल्याने उत्पादक आंदोलन करीत आहेत. सरकारने १ जुलैपासून सोयाबीनच्या दरात ९.९ टक्के वाढ केली आहे. प्रति क्विंटलसाठी हे दर आता ३,०५० रुपये आहेत. मक्याच्या दरात ७.१ टक्के वाढ करीत, हे दर प्रति क्विंटलसाठी १,४२५ रुपये केले आहेत. १ जुलै २०१२ नंतरचे या पिकांचे हे सर्वात जास्तीचे दर आहेत.