शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

शेतकरी आंदोलनानंतर शेतमालाचे दर वाढले !

By admin | Updated: June 21, 2017 01:28 IST

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच, २०१४ नंतर देशात तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाच्या किमान खरेदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच, २०१४ नंतर देशात तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाच्या किमान खरेदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. देशातील प्रमुख राज्यांत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शेतमालाला दर वाढून मिळाले आहेत, हे विशेष. सामान्य प्रकारच्या तांदळाच्या दरात ५.४ टक्के वाढ झाली असून, प्रति क्विंटलसाठी हे दर १,५५० रुपये आहेत. कापसाच्या दरातही दीर्घकाळानंतर वाढ करीत, हे दर १ जुलैपासून प्रति क्विंटलसाठी ४,३२० रुपये करण्यात आले आहेत. तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाचे दर वाढवावेत, यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाले होते. यासोबतच शेतकऱ्यांनी कर्जमाफीचीही मागणी केली होती. सरकार दोन डझनपेक्षा अधिक कृषी उत्पन्नाचे किमान खरेदीचे दर ठरविते. अर्थात, सरकार प्रामुख्याने गहू आणि तांदळाची खरेदी करते. कांदा, टोमॅटो आणि बटाटे यांच्या दरात घसरण झाल्यामुळे आणि सरकार या शेतमालाला रास्त दर देऊ न शकल्याने उत्पादक आंदोलन करीत आहेत. सरकारने १ जुलैपासून सोयाबीनच्या दरात ९.९ टक्के वाढ केली आहे. प्रति क्विंटलसाठी हे दर आता ३,०५० रुपये आहेत. मक्याच्या दरात ७.१ टक्के वाढ करीत, हे दर प्रति क्विंटलसाठी १,४२५ रुपये केले आहेत. १ जुलै २०१२ नंतरचे या पिकांचे हे सर्वात जास्तीचे दर आहेत.