शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

कोरड्या दुष्काळामागोमाग महागाई नाडणार?

By admin | Updated: August 18, 2015 13:45 IST

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच बिहारमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यामुळे कृषिमालाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याचा आणि परिणामी महागाई वाढण्याचा धोका असल्याची भीती कृषी मंत्रालयाने

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच बिहारमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यामुळे कृषिमालाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याचा आणि परिणामी महागाई वाढण्याचा धोका असल्याची भीती कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे. याचा अनुभव महाराष्ट्रात आत्ताच आला असून लासलगावमध्ये येणारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे वृत्त आहे. परिणामी कांद्याचा भाव होलसेल बाजारात किलोला ५० रुपये तर किरकोळ बाजारात ६० रुपये झाला आहे. अशीच परिस्थिती राहीली तर कांदा ७० रुपये किलोपेक्षा महाग होण्याची शक्यता आहे.
अनेक कृषिप्रधान परीसरामध्ये अवघा १९ टक्के पाऊस पडला असून यानंतरच्या राहिलेल्या मोसमात फारसा फरक पडण्याची चिन्हे नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या महिन्याभरात चांगला पाऊस पडला तरीही एकंदर देशात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पावसाचा अंदाज आहे. परिणामी मोदी सरकारला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात पडलेल्या खनिज तेलाच्या भावांनी महागाई कमी ठेवण्यासाठी मदत केली होती, जी आता पुरेशी पडणार नाही अशी चिन्हे आहेत.
केंद्राने गेल्या आठवड्यात कृषिक्षेत्रासाठी ३०० कोटी रूपयांचं रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे. त्यात डिझेल आणि बियाण्यांसाठी अनुदान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही दुष्काळग्रस्त शेतक-यांना कर्जमाफीसारख्या योजना देण्यात याव्यात यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.